पुढारी ऑनलाईन डेस्क : सुदानमधील सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यानचा संघर्ष चिघळला आहे. ओमदुरमन शहरावर शनिवारी हवाई हल्ला करण्यात आला. त्यामध्ये किमान २२ जणांचा मृत्यू झाला. लष्कराने ओमदुरमनच्या निवासी भागात हा हल्ला केल्याचा आरोप रॅपिड सपोर्ट फोर्सने (RSF) केला आहे. आठवडाभर चाललेल्या संघर्षात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
राजधानी खार्तूमजवळील ओमदुरमन या निवासी भागात शनिवारी हा हल्ला झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ला हा राजधानी आणि इतर शहरांमध्ये मुख्य निमलष्करी दल आणि सैन्य यांच्यातील सर्वात प्राणघातक संघर्षांपैकी एक आहे. गेल्या महिन्यात खार्तूममध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात पाच मुलांसह १७ जण ठार झाले होते. दरम्यान, निमलष्करी दलाने लष्करावर ओमदुरमनच्या निवासी भागात हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात ३१ जण ठार झाल्याचे आरएसएफने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :