Latest

Virat Kohli Resigns : राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीचे ‘या’ दोघांनाच ‘Big Thank you’!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Resigns : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहली कसोटी कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. विराटने एक ट्विट करत राजीनाम्याचे पत्र शनिवारी (दि. १५) सायंकाळी शेअर करत त्याने ही मोठी घोषणा केली.

पत्रात विराट म्हणतो की, मला प्रत्येक गोष्टीत 120 टक्के योगदान द्यायचे आहे. जर मी ते करू शकलो नाही तर ते चुकीचे असेल. मी याबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. (Virat Kohli Resigns)

विराट कोहली आपल्या पत्रात काय म्हणतो… (Virat Kohli Resigns)

संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी मी 7 वर्षे दररोज मेहनत केली. मी माझे काम अत्यंत प्रामाणिकपणे केले आणि त्यात कोणतीही कसर सोडली नाही. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी थांबलीच पाहिजे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यावर थांबण्याची हीच वेळ आहे. या प्रवासात अनेक चढउतार आले. पण, माझे प्रयत्न आणि विश्वास कधीच कमी झाला नाही. मी नेहमी प्रत्येक गोष्टीत १२० टक्के योगदान देऊ इच्छितो, जर मी तसे करू शकलो नाही तर ते चुकीचे होईल. मी याबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही.

मला इतके दिवस माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे (BCCI) आभार मानू इच्छितो. यासोबतच, मी माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्या व्हिजनवर विश्वास ठेवला आणि कोणत्याही परिस्थितीत शस्त्र सोडले नाही. तूम्ही माझा प्रवास संस्मरणीय आणि सुंदर बनवला. रवीभाई आणि सपोर्ट ग्रुप हे या वाहनाचे इंजिन आहेत, ज्यांनी सातत्याने कसोटी क्रिकेटला उभारी दिली आहे. माझ्या व्हिजनला प्रत्यक्षात आणण्यात तुम्ही सर्वांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शेवटी, महेंद्रसिंग धोनीचे खूप आभार, ज्याने कर्णधार म्हणून माझ्यावर खूप विश्वास ठेवला. मी भारतीय क्रिकेटला पुढे नेऊ शकेन यासाठी त्याने मला पात्र मानले. (Virat Kohli Resigns)

BCCI कडून आभाराचे ट्विट…

विराटच्या ट्विटवर बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल आभार मानणारे ट्विट केले आहे. बीसीसीआयने लिहिले की, 'टीम इंडिया कॅप्टन कोहलीचे त्याच्या प्रेरणादायी नेतृत्व क्षमतेबद्दल अभिनंदन आहे. ज्याने संघाला अधिक उंचीवर नेले आहे. त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले, त्यापैकी 40 कसोटी सामने भारताने जिंकले.' (Virat Kohli Resigns)

दरम्यान, दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. निवडकर्त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले होते की, आम्ही कोहलीला T20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले होते, परंतु त्याने आमचे ऐकले नाही. वनडे आणि टी २० च्या संघांसाठी एकच कर्णधार असायला हवा असे त्यांचे म्हणणे होते. (Virat Kohli Resigns)

T20 विश्वचषकानंतर कोहलीने (virat kohli) T20 संघाचे कर्णधारपदही सोडले होते. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआयने कोहलीला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले होते. त्याच्या जागी रोहित शर्माला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

आता कसोटी संघाच्या कर्णधारपदी कोणाला संधी मिळणार ?

2014 मध्ये विराट कोहलीला कसोटीचे कर्णधारपद मिळाले होते. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि 40 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. त्याच्यानंतर महेंद्रसिंग धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि 27 सामने जिंकले.

SCROLL FOR NEXT