पुढारी ऑनलाईन : मिग २९ के हे लढाऊ विमान तळावर परतत असताना गोव्यातील समुद्र किनाऱ्याजवळ कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. ही घटना विमानातील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे झाली असल्याचे समोर येत आहे. घटनेनंतर जलद शोध आणि बचाव कार्य राबवत, यामधील पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
या लढाऊ विमानातील पायलटची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही नौदलाने सांंगितले आहे. गोव्याच्या किनार्यावर मिग २९ के हे लढाऊ विमान अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश चौकशी मंडळाला (बीओआय) देण्यात आले असल्याचेही भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे.