पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे १४ जणांना घेऊन जाणारी बोट आज (दि. ३०) उलटली. या दुर्घटनेत ७ जण बेपत्ता झाले आहेत. तर ७ जण सुरक्षित असून बेपत्ता झालेल्या ७ जणांचा शोध घेतला जात आहे. एनडीआरएफच्या पथकाने शोध आणि बचावकार्य सुरू केले आहे, असे एएसआय सत्य नारायण सिंग यांनी सांगितले.