पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात गेले दोन दिवस वाढत असलेला तापमानाचा पारा बुधवारी थोडा घसरून 33.4 अंशांवर स्थिरावला. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला. बुधवारी पणजी शहरातील कमाल तापमान 33.4 अंश डिग्री सेल्सिअस होते, तर किमान तापमान 24.7 अंश डिग्री सेल्सिअस होते.
मुरगाव शहरात बुधवारी कमाल 34.1 अंश डिग्री सेल्सिअस व किमान 25.6 अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा 1-2 अंश डिग्री सेल्सिअसने जास्त आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात शीतलहरींचे कुंड तयार होऊन ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागात तुरळक पाऊस पडण्याचीही शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याचे संशोधक राहुल मोहन यांनी दिली.