चिकोडी : पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक सीमाभागातील चिकोडी, निपाणी, रायबाग, कागवाड भागातून होणार्या कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांत पुराची भीती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात वाहणार्या कृष्णेसह इतर नद्यांच्या पातळीत वाढ होऊन चिकोडी उपविभागातील 8 पूलवजा बंधारे पाण्याखाली गेल्या आहेत. काही मार्गावरील कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यानची वाहतूक बंद झाली आहे.
चिकोडी तालुक्यातील कल्लोळ कृष्णा नदीचे पात्र पाण्याबाहेर पडले आहे. त्यामुळे येथील दत्त मंदिराला पाण्याने वेढा दिला आहे. शेजारच्या शेतवडीतदेखील पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे रायबाग तालुक्यातील कुडची उगार दरम्यानच्या पुलावर पाणी आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावर बॅरिकेड्स लावले आहेत.
कृष्णा नदीवरील येडूर-कल्लोळ, बुवाची सौंदत्ती-मांजरी, उगार-कुडची, दूधगंगावरील मलिकवाड-दत्तवाड, कारदगा-भोज, भोजवाडी-कारदगा, एकसंबा-दत्तवाड, बारवाड-कुन्नूर, भोजवाडी-कुन्नूर.