पुढारी ऑनलाईन डेस्क : पोलीस आणि गोताखोरांच्या मदतीने आणखी आठ मृतदेह बाहेर काढले; आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया आणि शोध मोहीम सुरू आहे. फतेहपूरहून मार्का गावाकडे जाणारी बोट 11 ऑगस्ट रोजी यमुना नदीत उलटली होती.
उत्तर प्रदेशमधील बांदा येथे गुरुवारी (दि.11) दुपारी बोटीचा मोठा अपघात झाला. मार्का पोलीस ठाण्याच्या हद्दीत यमुना नदीच्या मध्यभागी एक बोट बुडाली. बोटीत 30 हून अधिक लोक होते. यातील चार जण कसेतरी पोहत नदी काठी पोहोचले. पोलीस प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. एसडीआरएफचेही पथक बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान बुडालेल्या चार जणांचे मृतदेह सापडले होते. रक्षाबंधनानिमित्त बोटीवर मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अपघाताची दखल घेतली. योगी यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.
या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मार्का येथून एक बोट काहुनहर घाट फतेहपूरकडे रवाना झाली. या दुर्घटनेबाबत गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या दुर्घटनाग्रस्त बोटीत सुमारे ३० लोक होते. नदीला वेगवान प्रवाह असल्याने बोट पाण्यात बुडाली.
हे ही वाचा :