३ कंपन्या आगीत जळून खाक 
Latest

गुजरातच्या उंबरगाव औद्योगिक क्षेत्रातील ३ कंपन्या आगीत जळून खाक

निलेश पोतदार

बोर्डी : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्याच्या उंबरगाव औद्योगिक क्षेत्रातील भारत रिसेन्स लिमिटेड कंपनीत सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली. कंपनीत ज्वलनशील पदार्थ व केमिकल असल्याने बाजूच्या दोन गारमेंट कंपन्यांनाही भीषण आग लागली.

भारत रिसेन्स कंपनीत आग लागल्याने कंपनीमधील केमिकल रस्त्यावर आणि रस्त्यालगच्या गटारात पसरले होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला अडचण निर्माण होत होती. गुजरातच्या वापी, वलसाड, सरीगाम, उंबरगाव तसेच महाराष्ट्रातील अदाणी थर्मल पावर स्टेशन येथील अग्निशमन दलाच्या एकुण १४ ते १५ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले. या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही, तसेच आगीचे कारण ही स्पष्ट झालेले नाही. सध्या आग नियंत्रणात असून, कुलिंगचे काम सुरू आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT