एसटी अपघातातील आठ जणांची ओळख पटली

एसटी अपघातातील आठ जणांची ओळख पटली
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : एसटी बस नर्मदा नदीमध्ये कोसळून मध्य प्रदेशात झालेल्या अपघातात मरण पावलेल्या १३ जणांपैकी आठजणांची ओळख पटली असून, यातील काही जण अंमळनेर, इंदूर आणि राजस्थानचे रहिवसी असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ही एसटी बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली असताना बस चालकाचा ताबा सुटल्याने ती नर्मदाा नदीत कोसळली. आोळख पटलेल्या प्रवाशांमध्ये चालक – चंद्रकांत एकनाथ पाटील, वाहक – प्रकाश चौधरी, निंबाजी आनंद पाटील, कमलाबाई आनंद पाटील, चेतन गोपाल जांगिड, जगन्नाथ हेमराज, सैफुद्दीन अब्बास व अरवा मूर्तजा यांचा समावेश आहे. या अपघातात आणखी काही प्रवासी वाहून गेले असण्याची भीतीहीव्यक्त करण्यात येत आहे.

इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या बसला अपघात झाला. अपघातात 13 जणांचा मृत्यू, 8 जणांची ओळख पटली आहे. यात 9 पुरुष आणि 4 महिला आहेत. मध्य प्रदेश परिवहन विभागाचे अधिकारी या अपघाताची चौकशी करत आहेत. याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समजेल.

                                                           – शेखर चने, उपाध्यक्ष, एस टी महामंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news