

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाकडे ( सीमालढा ) महाराष्ट्रातील जनतेचे आणि नेत्यांचे लक्ष वेधण्यासाठी खानापूरच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात धरणे आंदोलन शनिवारी होत आहे. दै. 'पुढारी'ने या लढ्याला नेहमीच पाठबळ दिले आहे. आम्हाला एकाकी सोडू नका, तुमच्यासोबत घ्या, ही सीमाबांधवांची हाक आपल्याला ऐकू येणार काय? लढ्याच्या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणारे दहा निवडक प्रश्न…