भाजपच्या महाप्रचारक बाबांच्या आक्षेपार्ह विधानावर सरकारने जीभ गहाण ठेवलीय का?, संजय राऊतांचा सवाल

संजय राऊत
संजय राऊत
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्‍ट्रात आज सरकार अस्‍तित्‍वात आहे कुठे? महाराष्‍ट्रात सध्याच्या सरकार विरोधात संतप्त वातावरण आहे. या सगळ्यांविरोधात आजच्या विदर्भातल्‍या सभेत योग्‍य समाचार घेतला जाईल, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना दिला. यावेळी रामदेव बाबांनी महिलांबद्दल केलेल्‍या आक्षेपार्ह वक्‍तव्याचाही त्‍यांनी समाचार घेतला.

रामदेव बाबांच्या विधानावर अमृता वहिनी गप्प का?

योगगुरू रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्‍याच्या प्रश्नावर बोलताना राउत म्‍हणाले, भगवी वस्‍त्रे घातलेले भाजपचे महाप्रचारक बाबा महिलांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य करतात. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्‍नी अमृता फडणवीस या कशा काय गप्प बसू शकतात असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला. एका कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य करूनदेखील सरकार त्‍यावर काही बोलत नाही. सरकारने आपली जीभ गहाण ठेवली आहे का? असा संतप्त सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला.

उद्धव ठाकरे हेच खरं सरकार

महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल छत्रपती शिवाजी महाराजांवर विधानं करतात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि अक्‍कलकोट घेण्याची भाषा करतात आणि आता हे रामदेव बाबा महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करतात मात्र सरकार यावर काहीच बोलत नाही. यावरून त्‍यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर कडाडून टीकास्‍त्र सोडले. या सरकार विरोधात जनमानसात रोष असून, उध्दव ठाकरे हेच खरं सरकार असल्‍याचं त्‍यांनी म्‍हटल आहे. दरम्‍यान आज उद्धव ठाकरे यांचा चिखलीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news