

नवी दिल्ली : पाण्यात बर्याच वेळ आपली हाताची किंवा पायाची बोटं असली की त्यावर रिंकल्स म्हणजेच सुरकुत्या येतात. मात्र, पाण्यातून बाहेर आल्यानंतर थोड्या वेळातच हाताची आणि पायाची बोटं आधी प्रमाणे सामान्य होऊ लागतात. असं का होतं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
पाण्यात बर्याचवेळ हात किंवा पाय ठेवल्याने आपल्या बोटांना सुरकुत्या येणे ही एक साधारण गोष्ट आहे. त्याचे कारण म्हणजे 'सेबम'. हा एक तेलकट पदार्थाप्रमाणे घटक आहे. त्याची कमतरता असणे किंवा जास्त असणे या दोन्ही गोष्टी चिंतेचा विषय असतात. कमी सेबम असणे ही त्वचेशी असलेली मोठी समस्या असते. कमी सेबममुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पिंपल्सचीही समस्या होऊ शकते. सेबम तेल जास्त असल्याने आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा आपल्या अंगावरून लगेच पाणी वाहून जाते. ते अंगावर थांबत नाही. जेव्हा आपण पाणी खूप वेळ ओततो किंवा पाण्यात आपले शरीर ठेवतो तेव्हा आपल्या शरीरातील सेबम कमी होते आणि पाणी शरीरात शिरायला सुरुवात होते. यामुळेच आपली त्वचा व बोटे संकुचित होऊ लागतात. बोटे सुकून संकुचित होण्याच्या या प्रक्रियेला 'ऑस्मोसिस' म्हणतात.
इंग्रजीत याला 'एक्वाटिक रिंकल्स' असेही म्हणतात. जेव्हा ती व्यक्ती पाण्यातून बाहेर येते तेव्हा काही वेळाने बोटे पुन्हा मूळ स्वरूपात येतात. असे होते कारण त्वचेच्या आत असलेले पाणी हळूहळू कोरडे होऊ लागते. हात आणि पायांमध्ये केराटिन असते, जे एक प्रकारचे प्रथिन आहे. केराटिन नावाचे हे प्रथिन शरीरातील पाणी कोरडे करण्याचे काम करते. हात आणि पायांमध्ये भरपूर केराटिन असल्याने शरीराचे हे दोन्ही भाग पाण्यात लवकर संकुचन पावू लागतात.