लोकांना दमदार परतावा देणारी टपाल खात्याची ही योजना आहे. या योजनेला भारत सरकारचे पाठबळ आहे. त्यामुळे या योजनांतील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
पोस्ट ऑफिसच्या ‘ग्रामसुरक्षा योजने’त कोणताही भारतीय नागरिक गुंतणूक करू शकतो. गुंतवणूक करणार्यांचे वय 19 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे.
या योजनेत मॅच्युरिटीची रक्कम ही कमाल 80 वर्षांपर्यंत मिळू शकते. यात वार्षिक दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.