

नवी दिल्ली : दिवसभरातील धावपळ आपल्याला अनेकदा शारीरिक आणि मानसिकद़ृष्ट्या थकवते. यामुळे अनेकदा लोक स्ट्रेस वगैरेला बळी पडतात. अशावेळी मनाला विश्रांती देण्यासाठी आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली जीवनशैली आणि वागणुकीत काही बदल करून तुम्ही स्वतःला मानसिकरीत्या निरोगी ठेवू शकता. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुमच्या आजूबाजूला सकारात्मकता जाणवेल. मानसिक थकवा घालवण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या या काही टिप्स…
आपल्या शरीराचे ऐकणे हे महत्त्वाचे ठरते. केवळ कंटाळा आला म्हणून काहीबाही खाणे योग्य नाही. तुमच्या शरीराला पोषण आणि ऊर्जेची गरज आहे. जेव्हा शरीराला भूक लागते तेव्हाच अन्न खावे. चोवीस तासांत किमान पाच मिनिटे ध्यान करावे. हळूहळू हा कालावधी वाढवावा. निम्म्याहून अधिक लोकसंख्येला झोपताना मोबाईल वापरण्याची सवय आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करणे थांबवा आणि मोबाईल बेडपासून दूर ठेवा. घाबरलेल्या अवस्थेत जे काम करणे सोपे आहे ते आपण करू शकत नाही. अशा वेळी दीर्घ श्वास घ्या.
हे आपण कुठेही, केव्हाही करू शकता. पण, घाबरून आपण विसरून जातो. त्यामुळे मळमळ जाणवल्यास डोळे बंद करून खोल श्वास घ्यायला विसरू नका. परताव्याची अपेक्षा न ठेवता लोकांना मदत करा. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी योगासने, ध्यान, एरोबिक्स, डान्स आणि झुंबा करायला हवा. आपल्या जोडीदाराला, आपल्या पालकांना, आपल्या मुलांना आणि आपल्या जवळच्या लोकांना सांगायला विसरू नका की आपण त्यांच्यावर किती प्रेम करता!