राज्यात घडविलेला अनधिकृत सत्तेचा डाव उधळला जाईल : संजय राऊत

शिवशक्‍ती-भीम शक्‍ती
शिवशक्‍ती-भीम शक्‍ती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना एकच आहे आणि एकच राहील. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली खरी शिवसेना आहे. ३५-४० लोक गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही. केंद्र सरकारच्या दबावापोटी राज्यात घडविलेल्या घटनाबाह्य सरकारचा डाव उधळला जाईल, असे शिवेसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. त्याच्यावर विश्वास ठेवतो. सर्वोच्च न्यायालयावरही विश्वास आहे. देशात संविधान, कायदा अजूनही जीवंत आहे. राज्यात घटनाबाह्य सरकार केंद्राच्या दबावापोटी घडविले आहे. तो डाव उधळला जाईल. सरकार सर्व विषयावर बोलते मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर का बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यातील एखाद्या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा देणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news