

हिंजवडी : मागील दोन दिवसात झालेला मुसळधार पाऊस आणि वाहतूक विभागाची ढिसाळ कारभार यामुळे आज बुधवारी (दि. ६ जुलै) रोजी सकाळी आयटी नगरी हिंजवडी आणि भूमकर वस्ती येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे दीड तास येथील वाहने पावसात अडकून पडली होती. त्यामुळे आयटीयन्स, नोकरदार वर्ग यांची मोठी अडचण निर्माण झाली होती.
आज पहाटे पासून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रस्ते दुतर्फा वाहत होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूककोंडी होणार हे अपेक्षित असताना वाहतूक विभागाचा कोणताही बंदोबस्त आयटी परिसरात न्हवता. याउलट मोठ्या कालावधी नंतर येथे वाहतून कर्मचारी उपस्थित झाले. परिणामी तब्बल दीड ते दोन तासांनंतर वाहतूक कोंडी सुटली आणि प्रवाशांनी आणि वाहनचालकांनी सुटकेचा श्वास घेतला. येथील लक्ष्मी चौक-भूमकर वस्ती रस्ता भूमकर चौक, शिवाजी चौक, सुरतवाल कॉम्प्लेक्स येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.