लिसेस्टर : वृत्तसंस्था : श्रेयस अय्यर (62), विराट कोहली (67) आणि रवींद्र जडेजा (नाबाद 56) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडमधील लिसेस्टर मैदानावर सुरू असलेल्या चारदिवसीय सराव सामन्यात भारताने तिसर्या दिवसअखेरीस 7 बाद 364 धावा केल्या होत्या. त्यांनी लिसेस्टर क्लबवर एकूण 366 धावांची आघाडी घेतली होती.
शुक्रवारी भारताचा दुसरा डाव शुभमन गिल आणि श्रीकर भरत यांनी सुरू केला. दोघांनी आत्मविश्वासने फलंदाजी करीत अर्धशतकापुढे धावसंख्या नेली. आक्रमक फलंदाजी करणारा शुभमन 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी आणि (9) आणि श्रीकर भरत (31) यांनी दिवसाचा खेळ संपवला. शनिवारी हनुमा विहारी (20) च्या रूपाने भारताची पहिली विकेट पडली. त्यानंतर दुसर्या डावातही अर्धशतक झळकावण्याच्या प्रयत्नात असलेला श्रीकर भरत (43) बाद झाला. विरोधी संघातून खेळणार्या नवदीप सैनीने त्याला बाद केले. यानंतर श्रेयस अय्यर (62) आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकरांनी संयमी फलंदाजी केली. सातव्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला
आला. चहापानाला खेळ थांबण्यापूर्वी शार्दूल ठाकूरचा (28) कमलेश नागरकोटीने त्रिफळा उडवला. विराट यावेळी 67 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा 56 धावांवर खेळत आहे. लिसेस्टर संघाकडून नवदीप सैनीने तीन विकेटस् घेतल्या.