रविचंद्रन अश्विनचे मोठे विधान म्हणाला, हिंदी राष्ट्रभाषा नाही...!

Ravichandran Ashwin | कॉलेजमध्ये पदवीदान समारंभात बोलताना वक्तव्य
Ravichandran Ashwin
हिंदी भाषेबद्दल रवि अश्विनचे मोठे वक्तव्य केले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा माजी अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने एका खाजगी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल मोठे विधान केले आहे. पदवीदान समारंभात अश्विनने हिंदी भाषेवर भाष्य केले. अश्विन म्हणाले की, हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. अश्विनने विद्यार्थ्यांना विचारले की जर कोणाला इंग्रजी किंवा तमिळ बोलता येत नसेल तर त्यांना हिंदीमध्ये प्रश्न विचारण्यास रस आहे का?

Ravichandran Ashwin
असा ‘अश्विन’ होणे नाही!

Ravichandran Ashwin | अश्विन म्हणाला हिंदी ही अधिकृत भाषा

यावेळी अश्विनने भारतातील भाषेचा मुद्दा उपस्थित केला. हिंदी शब्द बोलल्यानंतर लोक कसे प्रतिक्रिया देतात ते त्याने पाहिले. अश्विन आपल्या भाषणादरम्यान म्हणाला, 'मला वाटते की मी असे म्हणायला हवे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही, ती अधिकृत भाषा आहे.' हिंदी आणि तमिळ भाषेबद्दल नेहमीच चर्चा होत असते हे ज्ञात आहे. तामिळनाडूमध्ये हा एक संवेदनशील मुद्दा आहे.

अश्विनने कर्णधारपदाबद्दल मांडले आपले मत

अश्विनने अलिकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीबद्दलही सांगितले. अश्विन त्याच्या स्पष्ट विचारांसाठी ओळखला जातो. तो म्हणाला की, तो कर्णधारपद स्वीकारेल अशी अनेक वेळा अटकळ होती, पण त्याने कधीही तसे केले नाही. अश्विन म्हणाला, जेव्हा कोणी म्हणतो की मी हे करू शकत नाही तेव्हा मला ते नक्कीच करायचे असते. पण जेव्हा कोणी म्हणते की मी हे करू शकतो, तेव्हा मला रस कमी होतो.

Ravichandran Ashwin
अश्विन अन्नाची कमाल! ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ बनून केली विक्रमी धमाल

Ravichandran Ashwin | अश्विन हा भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज

कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन सातव्या स्थानावर आहे. अश्विनने 106 कसोटी सामन्यात 537 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 59 धावांत सात बळी ही आहे. या काळात त्याची सरासरी 24.00 आणि स्ट्राईक रेट 50.73 आहे. अनिल कुंबळेनंतर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. कुंबळेच्या नावावर 619 कसोटी विकेट्स होत्या. घरच्या मैदानावर पदार्पणापासून, संघात निवड झाल्यानंतर त्याने प्रत्येक वेळी कसोटी सामने खेळले आहेत. त्याने घरी एकही कसोटी चुकवली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news