पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Record : भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने WTC मध्ये नवा विक्रम रचला. बांगलादेशविरुद्धच्या कानपूर कसोटीत त्याने सामन्याच्या चौथ्या दिवशी एकूण तीन बळी (पहिल्या डावात 2 आणि दुस-या डावात 1) घेतले. यासह त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या 2023-25 च्या हंगामात 50 विकेट पूर्ण केल्या. अशा प्रकारे तो आता WTC च्या तीनही हंगामात बळींचे अर्धशतक पूर्ण करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. यंदाच्या हंगामात शाकिब अल हसन हा अश्विनचा 50 वा बळी ठरला आहे.
डब्ल्यूटीसीमध्ये अश्विनची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 2019-21 च्या हंगामात 14 सामन्यांमध्ये 71 बळी घेतले. त्यानंतर पुढील हंगामातील (2021-23) 13 सामन्यांमध्ये 61 बळी पटकावले. त्याचप्रमाणे, चालू हंगामात (2023-25) त्याने केवळ 10 सामन्यांमध्ये 50 बळी पूर्ण केले आहेत. यासह तो आता डब्ल्यूटीसीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी (183) घेणारा गोलंदाज बनला आहे.
डब्ल्यूटीसीच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या नावावर आहे त्याच्या नावावर 187 विकेट्स आहेत. अश्विनने कामपूर कसोटीत आणखी 5 विकेट घेतल्यास तो नॅथन लायनला मागे टाकेल.
बांगलादेशच्या दुस-या डावाला अश्विनेने खिंडार पाडले. पहिले दोन बळी घेऊन तो तो सध्याच्या डब्ल्यूटीसी हंगामात सर्वाधिक बळींच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने जोश हेझलवूडला (11 सामन्यांत 51 विकेट्स) मागे टाकले.