
सूर्यकुमार यादव (भारत) : "आम्ही प्रथम गोलंदाजी करू. दव पडण्याची शक्यता असल्याने हा चांगला पर्याय आहे. हे मैदान शानदार आहे. या मैदानावरचा हा पहिला पुरुष आंतरराष्ट्रीय सामना असल्याने आम्ही उत्साहित आहोत. खेळाडूंनी जबाबदारी ओळखून खेळणे महत्त्वाचे आहे. कटक येथे १७५ धावा करणे जास्त होते, आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हार्दिक पंड्यामुळे संघाला जो समतोल मिळतो तो अविश्वसनीय आहे. तो शांत राहतो आणि त्याचे ओव्हर्स संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही त्याच संघात खेळत आहोत."
एडन मार्कराम (दक्षिण आफ्रिका): "आम्हीही गोलंदाजी निवडली असती. विकेट चांगली दिसत आहे. आम्हाला प्रथम फलंदाजी करून धावा उभाराव्या लागतील आणि भारतावर दबाव आणावा लागेल. प्रत्येक सामन्यातून शिकायला मिळते. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्ही एक चांगली धावसंख्या उभी करू इच्छितो. आमच्या संघात तीन बदल आहेत."