
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा थरार आज बुधवारी (१७ डिसेंबर) लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर रंगणार आहे. मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेला भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेसाठी हा 'करो या मरो' असा सामना असून, मालिका जिवंत ठेवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.