
भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू असलेला कसोटी सामना एका रोमांचक वळणावर पोहोचला आहे. इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य आहे, ज्याच्या प्रत्युत्तरात या संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 21 धावा केल्या आहेत. जॅक क्रॉली आणि बेन डकेट क्रीजवर आहेत. इंग्लंडला जिंकण्यासाठी आणखी 350 धावांची आवश्यकता आहे, तर भारताला 10 विकेट्सची आवश्यकता आहे. आज 90 षटके खेळायची आहेत, अशा परिस्थितीत उत्साहाच्या सर्व मर्यादा मोडल्या जातील.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या या पहिल्याच सामन्याची इतिहासात एक अविस्मरणीय सामना म्हणून नोंद होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघ पाचव्या दिवशी ऐतिहासिक विजयाचे स्वप्न पाहत आहेत. लीड्सच्या प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर, ज्याचा स्वतःचा एक गौरवशाली इतिहास आहे, विजयाचे समीकरण दोन्ही संघांसाठी अगदी सोपे आहे. इंग्लंड 350 धावा करण्यापूर्वी भारताने त्यांचे दहा गडी बाद केल्यास, भारत मालिकेत आघाडी घेईल. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, भारतीय आणि इंग्लिश चाहत्यांसह तटस्थ प्रेक्षकांमध्येही सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होईल अशी अपेक्षा असल्याने वातावरणात एक प्रकारची उत्सुकता आणि धाकधूक आहे.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या या पहिल्याच सामन्याची इतिहासात एक अविस्मरणीय सामना म्हणून नोंद होण्याची दाट शक्यता आहे. दोन्ही संघ पाचव्या दिवशी ऐतिहासिक विजयाचे स्वप्न पाहत आहेत. लीड्सच्या प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर, ज्याचा स्वतःचा एक गौरवशाली इतिहास आहे, विजयाचे समीकरण दोन्ही संघांसाठी अगदी सोपे आहे. इंग्लंड 350 धावा करण्यापूर्वी भारताने त्यांचे दहा गडी बाद केल्यास, भारत मालिकेत आघाडी घेईल. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, भारतीय आणि इंग्लिश चाहत्यांसह तटस्थ प्रेक्षकांमध्येही सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार होईल अशी अपेक्षा असल्याने वातावरणात एक प्रकारची उत्सुकता आणि धाकधूक आहे.
चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने 6 षटकांच्या छोटेखानी खेळात बिनबाद 21 धावा केल्या होत्या. सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी तो अवघड टप्पा यशस्वीपणे पार पाडला. तथापि, भारतीय संघ फारसा चिंतेत नसेल, कारण जसप्रीत बुमरा नव्या दमाने आणि अजूनही ताज्या असलेल्या ड्यूक्स चेंडूने गोलंदाजी करण्यास सज्ज असेल. भारताला विजय मिळवायचा असेल, तर बुमराला प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांच्याकडून मोलाच्या योगदानाची आवश्यकता असेल. जर हे तिघेही एकत्रितपणे प्रभावी मारा करू शकले, तर ओव्हल 2021 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
दुसरीकडे, इंग्लंडला पाचव्या दिवशी प्रेरणा त्यांच्या अलीकडच्या भूतकाळातील कामगिरीतून मिळेल. 2019 मध्ये याच मैदानावर बेन स्टोक्सने ॲशेस मालिकेत अविश्वसनीय खेळी करून सामना जिंकून दिला होता. 2022 मध्ये एजबॅस्टन येथे भारताविरुद्धच, जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी अविस्मरणीय भागीदारी रचून इंग्लंडचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग नोंदवला होता. 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केल्याची ही दोन उदाहरणे संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढवतील.
पाचव्या दिवशी जसजसा सामना अंतिम टप्प्यात जाईल, तसतसे त्या ऐतिहासिक सामन्यांच्या आठवणी ताज्या होतील आणि सामन्यात अनेकदा पारडे फिरण्याची शक्यता आहे. भारताने कोणत्याही टप्प्यावर झटपट दोन गडी बाद केल्यास त्यांचे पारडे जड होईल. तर इंग्लंडच्या कोणत्याही महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे युवा कर्णधार शुभमन गिलवर विजयासाठीचे दडपण वाढेल. खराब होत चाललेल्या खेळपट्टीवर आणि अपेक्षित ढगाळ हवामानात जसप्रीत बुमराहा हा त्याचा मुख्य पर्याय असेल, परंतु गिलला केवळ बुमरावर अवलंबून राहून चालणार नाही. बुमराह कितीही उत्कृष्ट गोलंदाज असला तरी, त्याला शक्य तितके दिर्घ खेळून काढून त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कमी प्रभावी ठरलेल्या गोलंदाजांवर दडपण आणण्याचे इंग्लंडचे ध्येय असेल.