

भारतीय क्रिकेट संघाने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवून ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या धमाकेदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने हा विजय सहज नोंदवला. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.
अक्षर-गिलची चमक
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला नाही. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून १६७ धावांचा सन्मानजनक स्कोर उभारला. सलामीवीर शुभमन गिलने संयमी, पण महत्त्वपूर्ण ४६ धावांची (३९ चेंडू) खेळी करत संघाचा डाव सावरला.
धावांची गती वाढवण्याची जबाबदारी अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेलने यशस्वीरीत्या पार पाडली. त्याने केवळ ११ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावा (१ चौकार, १ षटकार) ठोकत संघाला १६७ पर्यंत पोहोचवले.
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि अॅडम झाम्पा यांनी प्रभावी मारा करत प्रत्येकी ३-३ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला
१६८ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला आणि त्यांचा संपूर्ण डाव केवळ ११९ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
भारतासाठी गोलंदाजीत अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दबाव कायम ठेवला.
'सामनावीर' अक्षर पटेलची अष्टपैलू कामगिरी
भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो अक्षर पटेल. त्याने आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधले.
फलंदाजी : अखेरच्या क्षणी १९०.९१ च्या दमदार स्ट्राइक रेटने ११ चेंडूंमध्ये २१ धावा करून त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले.
गोलंदाजी : गोलंदाजीत अक्षर अधिकच प्रभावी ठरला. त्याने आपल्या ४ षटकांत केवळ २० धावा खर्च करत २ महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याची इकोनॉमी रेट केवळ ५ इतकी प्रभावी होती. त्याने मॅथ्यू शॉर्ट (२५) आणि जोश इंग्लिश (१२) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
एलिस आणि झाम्पाचा गोलंदाजीत विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत चांगली कामगिरी झाली असली तरी फलंदाजांनी निराशा केली.
नॅथन एलिस याने भेदक गोलंदाजी करत ४ षटकांत २१ धावा देत ३ बळी मिळवले. त्याने या मालिकेत ४ सामन्यांत ९ बळी घेतले असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. झाम्पानेही ३ विकेट्स घेतल्या.
या सामन्यादरम्यान दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वैयक्तिक विक्रम नोंदवले :
एलिसचे ५० टी-२० आंतरराष्ट्रीय बळी : एलिसने आपल्या कारकिर्दीत ५० बळींचा टप्पा पूर्ण केला. त्याने ३१ सामन्यांमध्ये १७.४८ च्या प्रभावी सरासरीने हे यश मिळवले. त्याने सर्वाधिक १६ बळी भारताविरुद्धच घेतले आहेत.
झाम्पाने रौफला मागे टाकले : अॅडम झाम्पा (१३४ विकेट्स) याने पाकिस्तानच्या हारिस रौफ (१३३ विकेट्स) याला मागे टाकत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ८ वे स्थान पटकावले आहे.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाला विजयासाठीचे १६८ धावांचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले. ज्या खेळपट्टीवर फटके मारणे सहज नव्हते, तिथे ऑस्ट्रेलियन संघ पूर्णपणे अडकला.
ही खेळपट्टी दुहेरी गतीची होती, तसेच उसळीमध्येही बदल जाणवत होता. या कठीण खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी मध्यक्रमात ऑस्ट्रेलियाला जखडून टाकले. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडगोळीने ऑस्ट्रेलियाच्या धावांना ब्रेक लावत त्यांची गती पूर्णपणे रोखली. अखेरच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भेदक गोलंदाजी करत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. सामन्याला कलाटणी देणाऱ्या दोन मोठ्या विकेट्स शिवम दुबेच्या नावावर राहिल्या. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श आणि धोकादायक फलंदाज टिम डेव्हिड या दोघांना बाद करून भारताला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
नव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती, पण त्यानंतर त्यांची फलंदाजी पूर्णपणे दिशाहीन झाली. हीच परिस्थिती भारताच्या डावातही दिसली होती, पण भारताने उभारलेल्या १६७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासाठी खूपच मोठे ठरले आणि भारताने हा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली.
भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे.
जसप्रीत बुमराहचा 'स्लोअर बॉल' यशस्वी : डावाच्या १७.६ व्या षटकात जसप्रीत बुमराहने आपला अनुभव पणाला लावत बेन ड्वारशुईसला त्रिफळाचीत केले. त्याने सलग चार धीम्या गतीचे चेंडू टाकले. त्यातील शेवटचा चेंडू ड्वारशुईसच्या स्लॉग फटक्याच्या वेळी अचूकपणे खाली आला आणि मिडल-लेग स्टंपच्या तळाशी आदळला. बुमराहने १/२७ अशी प्रभावी कामगिरी केली.
बेन द्वारशुईस (५ धावा, ७ चेंडू)
सुंदरच्या जाळ्यात झाम्पा : १८.२ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने ॲडम झाम्पाला भोपळाही न फोडता बाद केले. झाम्पाने मारलेला फटका थेट लाँग-ऑनवर उभ्या असलेल्या शुभमन गिलच्या हातात गेला आणि गिलने कोणतीही चूक केली नाही.
ॲडम झाम्पा (० धावा, १ चेंडू)
भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर काळ बनून आला. त्याने आपल्या एकाच षटकात सलग दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. मात्र त्याची हॅटट्रिकवर हुकली.
स्टोईनिस रिव्हर्स-स्वीपमध्ये फसला
१६.४ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने मार्कस स्टोईनिसला (१७ धावा) पायचीत केले. मैदानी पंचांच्या निर्णयावर स्टोईनिसने पुनर्विचार (रिव्ह्यू) घेतला, मात्र 'बॉल-ट्रॅकिंग'मध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट झाले. सुंदरने टाकलेला हा वेगाने आणि सरळ आलेला चेंडू खेळपट्टीवरून झटकन उसळला. स्टोईनिस रिव्हर्स-स्वीप मारण्याच्या प्रयत्नात चुकला आणि चेंडू त्याच्या पाठीच्या पायाला लागला. रिव्ह्यूमध्ये चेंडू स्टंप्सना आदळत असल्याचे सिद्ध झाले आणि स्टोईनिसची झुंज संपुष्टात आली.
बार्टलेटला शून्यावर माघारी
पुढच्याच चेंडूवर, सुंदरने झेवियर बार्टलेटला (० धावा) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. बार्टलेटने चेंडू आडव्या रेषेत खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या पुढील कडेला लागून हवेत गेला. सुंदरने पुढे धावत हा सोपा झेल टिपला. या 'डबल स्ट्राइक'मुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. सुंदर आता हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर उभा आहे.
वरुण चक्रवर्तीने टाकलेला 'गुगली' चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर अचूक टप्प्यावर पडला. मॅक्सवेलने हा चेंडू ऑफ-साईडला मारण्यासाठी जागा बनवली, मात्र त्याला चेंडूचा अंदाज घेता आला नाही. चेंडू मॅक्सवेलला पूर्णपणे चुकवून गेला आणि त्याने ऑफ स्टंपच्या वरच्या भागाला केवळ स्पर्श केला. परिणामी यष्ट्या उडाल्या आणि मॅक्सवेलला अवघ्या ४ चेंडूंत २ धावा करून माघारी परतावे लागले. या विकेटमुळे भारताने आता सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने आपल्या नवीन स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला पाचवा मोठा धक्का दिला आहे. डावातील १३.१ व्या षटकात त्याने जोश फिलिपला (१० धावा) वरुण चक्रवर्तीकरवी झेलबाद केले.
अर्शदीपने ओव्हर द विकेट लेग स्टंपवर चांगल्या टप्प्याचा चेंडू टाकला. फिलिपने आडवा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूवर त्याचे नियंत्रण नव्हते. चेंडू बॅटला लागून हवेत ऊंच गेला आणि थेट शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने उभ्या असलेल्या वरुण चक्रवर्तीच्या हातात विसावला. हा फटका खेळताना चेंडू खेळपट्टीवरून अचानक उसळी घेऊन आला असावा किंवा फिलिपच्या बॅटवर उशिरा आला असावा, असा अंदाज आहे. फिलिपच्या या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली असून, त्यांच्यावरील दबाव आणखी वाढला.
जोश फिलिप (१० धावा, १० चेंडू, १ चौकार) वरुण चक्रवर्तीकडे झेलबाद, गोलंदाज अर्शदीप सिंग.
अखेर अर्शदीप सिंगने भारताला महत्त्वाचे यश मिळवून दिले. त्याने जोश फिलिपला बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून आता सामन्यातील गती निसटली आहे आणि ते प्रचंड दबावाखाली आले आहेत. फिलिप बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज ग्लेन मॅक्सवेल मैदानात आला. यजमान संघासाठी आता मॅक्सवेल हाच मुख्य आधार असणार आहे.
१४ षटकाअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद ९९
शिवम दुबेने ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला. त्याने टिम डेव्हिडला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. डेव्हिड नऊ चेंडूत १४ धावा काढून बाद झाला.
१० व्या षटकात ७० धावांवर ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. शिवम दुबेने कर्णधार मिचेल मार्शला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केले. मार्शने २४ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या.
९ व्या षटकात ६७ धावांवर ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. अक्षर पटेलने जोश इंग्लिसला क्लीन बोल्ड केले. इंग्लिस केवळ १२ धावाच करू शकला. यापूर्वी अक्षरने मॅथ्यू शॉर्टलाही तंबूचा रस्ता दाखवला होता.
आठ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाने १ गडी गमावून ६२ धावा केल्या. त्यावेळी मिचेल मार्श २५ धावा आणि जोश इंग्लिस १२ धावा काढून क्रीझवर होते. या दोघांमध्ये २५ धावांची भागीदारी झाली. दरम्यान, मार्श २१ धावांवर खेळत असताना, लॉन्ग-ऑफवर उभ्या असलेल्या अभिषेक शर्माकडून त्याचा कठीण झेल सुटला होता. डाइव मारण्याच्या प्रयत्नात चेंडू त्याच्या हातातून निसटला.
ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का अक्षर पटेलने दिला. त्याने सलामीवीर मॅथ्यू शॉर्टला पायचीत केले. शॉर्ट १९ चेंडूंमध्ये २५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ षटकांच्या अखेरीस १ बाद ३९ होती.
ऑस्ट्रेलियाने ३ षटकांच्या समाप्तीनंतर एकही गडी न गमावता २६ धावा केल्या. मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी सलामी दिली.
टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना, भारताने २० षटकांच्या समाप्तीनंतर ८ गड्यांच्या मोबदल्यात १६७ धावा केल्या. यासह कांगारूंना विजयासाठी १६८ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गिलने अभिषेक शर्माच्या साथीने संघाला चांगली सुरुवात करून दिली, मात्र गिलला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या डावात उत्कृष्ट मारा केला. फिरकीपटू ॲडम झाम्पा आणि वेगवान गोलंदाज नॅथन एलिस या दोघांनीही प्रत्येकी तीन-तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत भारतीय फलंदाजांवर दबाव ठेवला.
भारताच्या फलंदाजांनी डावाची चांगली सुरुवात करूनही, मध्यक्रमातील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला २०० धावांचा टप्पा गाठण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी निर्णायक वेळी शानदार प्रदर्शन करत सामन्यातील गती पुन्हा आपल्या बाजूने खेचून घेतली.
अभिषेक शर्मा पॉवर-प्लेनंतर लगेच बाद झाला आणि ५६ धावांची मजबूत सलामीची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर आलेल्या शिवम दुबेलाही मोठी खेळी साकारता आली नाही. नॅथन एलिसने शिवम दुबेला (२२ धावा) बाद करून चांगली भागीदारी मोडून भारतावर दबाव वाढवला. सलामीवीर शुभमन गिलने ३९ चेंडूंमध्ये ४६ धावा केल्या, पण त्याचा स्ट्राइक रेट (११७.९५) अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिला. गिलने क्रीझवर बराच वेळ घालवूनही त्याला धावगती वाढवण्यात संघर्ष करावा लागला.
सूर्यकुमार यादव माघारी परतल्यानंतर, धावसंख्येला अंतिम गती देण्याची महत्त्वाची जबाबदारी तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांच्यावर होती. मात्र, या दोघांच्याही झटपट विकेट्स पडल्या. जितेश आणि तिलक यांच्या जलद बाद होण्याने भारताला मोठा धक्का बसला आणि २०० धावांपर्यंत पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. या काळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आणि भारताला १६७ धावांवर समाधान मानावे लागले.
डावाच्या शेवटच्या आणि २० व्या षटकात भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने आक्रमक पवित्रा घेत तुफान फटकेबाजी केली. मार्कस स्टोईनिसने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षरने चौकार ठोकला, तर दुसऱ्या चेंडूवर दणदणीत षटकार मारून ऑस्ट्रेलियावर दबाव वाढवला. या दोन फटक्यांनंतर अक्षरने एक धाव घेऊन स्ट्राइक बदलला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या अर्शदीप सिंगला मात्र मोठी खेळी करता आली नाही. षटकाचा चौथा चेंडू फटकावण्याच्या नादात त्याने आपली महत्त्वाची विकेट गमावली.
अर्शदीपने मारलेला फटका खूपच उंच गेला. स्टोईनिसने टाकलेला हा धीम्या गतीचा 'लेंथ बॉल' होता. अर्शदीप सिंगने स्लॉग फटका मारण्याचा प्रयत्न लवकर सुरू केला, ज्यामुळे चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागून आकाशात खूप उंचीवर गेला. चेंडू वेगाने हवेत फिरत असताना, बदली यष्टिरक्षक फिलिपला अत्यंत हुशारीने लक्ष केंद्रित करावे लागले. त्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत चेंडू सुरक्षितपणे झेलला. अर्शदीप सिंगला केवळ तीन चेंडूंत शून्य धावा करून माघारी जावे लागले.
पुढच्या दोन चेंडूंवर भारतला तीन धावा मिळाल्या. ज्यामुळे संघाची धावसंख्या २० षटकांअखेर ८ बाद १६७ पर्यंत पोहचली.
नॅथन एलिसने आपल्या भेदक गोलंदाजीचा धडाका सुरूच ठेवला आहे. डावातील १८.४ व्या षटकात त्याने वॉशिंग्टन सुंदरला (१२ धावा) बाद करत भारताला सातवा मोठा झटका दिला.
एलिसने पूर्ण वेगाने अत्यंत 'फुल लेंथ' चेंडू टाकला. वॉशिंग्टन सुंदरने तो चेंडू 'डाउन द ग्राउंड' मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूच्या लांबीमुळे तो चेंडूखाली पोहोचण्यात अपयशी ठरला. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागून हवेत गेला. बदली खेळाडू कुहनेमनने मिड-ऑफला उभा राहून हा झेल सहजपणे पूर्ण केला. ७ चेंडूंमध्ये २ चौकारांसह १२ धावांची जलद खेळी करूनही, सुंदरला आपली विकेट वाचवता आली नाही. नॅथन एलिसचा हा यशस्वी स्पेल ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत मोलाचा ठरला.
वॉशिंग्टन सुंदर (१२ धावा, ७ चेंडू, २ चौकार)
१९ व्या षटकाखेर भारत ७ बाद १५७ धावा
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पा आज भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरला. त्याने डावाच्या १६.४ व्या षटकात जितेश शर्माला पायचीत करत ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले.
जितेश शर्मा 'स्वीप' फटका मारण्याच्या प्रयत्नात चुकला. चेंडू त्याच्या पॅडवर आदळला. मैदानी पंचांनी 'नॉट आऊट'चा निर्णय दिला. मात्र, कर्णधार मिचेल मार्शने रिव्ह्यू घेतला. 'बॉल ट्रॅकिंग'मध्ये चेंडू लेग स्टंपवर आदळत असल्याचे स्पष्ट झाले. तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय बदलला. यासह भारताने लागोपाठ दुसरी विकेट गमावली.
१२१/२ अशा भक्कम स्थितीवरून भारताची अवस्था आता १३६/६ अशी झाली. झाम्पाने टाकलेला हा चेंडू चांगल्या टप्प्यावर पडून थोडासा पकडला गेला आणि सरळ राहिला, ज्यामुळे तो लेग स्टंपवरून बाहेर गेला नाही.
जितेश शर्मा (३ धावा, ४ चेंडू).
ॲडम झाम्पाने आपल्या फिरकी गोलंदाजीने पुन्हा एकदा भारताला मोठा झटका दिला. डावातील १६.१ व्या षटकात त्याने युवा फलंदाज तिलक वर्माला (५ धावा) यष्टिरक्षक जोश इंग्लिसकरवी झेलबाद केले. तिलकने झाम्पाला रिव्हर्स-स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फटका मारण्यात अयशस्वी ठरला. चेंडू बॅटच्या किनाऱ्याला घासून यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. या संधीचा फायदा घेत यष्टिरक्षक जोश इंग्लिसने कोणतीही चूक न करता सुरेख झेल घेतला आणि ऑस्ट्रेलियाच्या गोटात जोरदार जल्लोष सुरू झाला.
झेवियर बार्टलेटने डावातील १५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (२० धावा) याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद करत भारताला चौथा धक्का दिला.
सूर्यकुमार यादवची १० चेंडूंमधील २० धावांची (२ षटकार) वादळी खेळी अखेर संपुष्टात आली. बार्टलेटच्या शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवर 'स्काय'ने आडव्या रेषेत जोरदार बॅट फिरवली. या फटक्याला चांगली उंची मिळाली, मात्र तो चेंडू सीमारेषेपासून थोडा दूर राहिला. लाँग-ऑनवर उभ्या असलेल्या टिम डेव्हिडने हा महत्त्वाचा झेल घेतला. डेव्हिडच्या हातातून चेंडू जवळपास निसटला होता, परंतु त्याने अंगठ्याच्या टोकावर (फिंगरटिप्सवर) तो झेल व्यवस्थित पकडून भारताचा महत्त्वाचा फलंदाज तंबूत धाडला. सूर्यकुमार यादवच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा सामन्यावर पकड मिळवली.
नॅथन एलिसने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. भारताचा सलामीवीर शुभमन गिल (४६ धावा) डावातील १४.१ व्या षटकात त्याच्या 'स्लोअर बॉल' जाळ्यात अडकून त्रिफळाचीत झाला.
एलिसने 'बॅक-ऑफ-द-हँड' तंत्राचा वापर करत हा चेंडू अतिशय अचूकपणे टाकला. त्याने चांगल्या टप्प्यावर टाकलेला हा धीम्या गतीचा चेंडू होता, ज्यावर गिल आडवा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, चेंडूच्या गतीतील बदलामुळे तो बॅटच्या खालून अलगदपणे निसटला आणि थेट ऑफ स्टंपवर आदळला. गिलने नव्या चेंडूवर चांगली सुरुवात केली होती, परंतु चेंडू जुना झाल्यावर त्याला धावगती वाढवण्यात संघर्ष करावा लागला आणि ४६ धावांवर त्याचा डाव संपुष्टात आला.
शुभमन गिल ४६ धावा (३९ चेंडू, ४ चौकार, १ षटकार)
१५व्या षटकाअखेर भारत ३ बाद १२५ धावा
मार्कस स्टोईनिस डावातील १४ वे षटक टाकण्यासाठी आला आणि या षटकाची सुरुवातच नाट्यमय झाली. पहिला चेंडू सूर्यकुमार यादवच्या पॅडवर आदळला. यावर स्टोईनिसने जोरदार अपिल केले, परंतु मैदानी पंचांनी ते फेटाळून लावले. कर्णधार मार्शने त्वरित रिव्ह्यू घेतला. मात्र, तिसऱ्या पंचांनी तपासणीअंती सूर्या बाद नसल्याचे स्पष्ट केले आणि मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला.
या नाट्यमयतेनंतर गिलने स्टोईनिसच्या याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकला. या दबावात स्टोईनिसने लागोपाठ दोन 'वाईड' चेंडू फेकले. अखेरीस, या षटकात भारताने एकूण १३ धावा वसूल केल्या.
१४व्या षटकाअखेर भारत २ बाद १२१ धावा
शिवम दुबे बाद झाल्यानंतर भारताचा 'मिस्टर ३६०' अर्थात सूर्यकुमार यादव मैदानात आला आणि त्याने येताच आक्रमक पवित्रा घेतला. ऑस्ट्रेलियाचा मुख्य फिरकीपटू ॲडम झाम्पा डावातील आपले तिसरे षटक टाकत असताना, सूर्यकुमार यादवने त्याला लक्ष्य केले. या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सूर्याने सलग दोन दणदणीत षटकार ठोकले. सूर्यकुमारच्या या स्फोटक खेळीमुळे हे १३ वे षटक भारतासाठी अतिशय फलदायी ठरले. या एकाच षटकात भारताने १८ धावा वसूल केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा दबाव वाढला. या षटकात भारताचे शतक पूर्ण झाले.
१२व्या षटकाअखेर भारत २ बाद १०८ धावा
नॅथन एलिसने टाकलेल्या अप्रतिम 'स्लोअर-कटर' चेंडूवर भारताचा फलंदाज शिवम दुबे (२२ धावा) त्रिफळाचीत झाला आणि भारताला ११.३ षटकांत दुसरा मोठा धक्का बसला.
गोलंदाजीतील हुशारी : ओव्हर द विकेट टाकलेल्या या चेंडूच्या अचूक रेषेमुळे दुबे पूर्णपणे गोंधळला आणि तो अडकला. एलिसने अत्यंत हुशारीने हा धीम्या गतीचा 'ऑफ-कटर' चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ टाकला होता. दुबेने चेंडू 'क्लिप' करण्याचा प्रयत्न केला, पण फटका मारताना क्रीझवर त्याचे संतुलन बिघडले. याचा फायदा घेत चेंडू थेट लेग स्टंपवर आदळला आणि दुबेला पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागला. दुबेने १८ चेंडूंत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. एलिसच्या या निर्णायक विकेटमुळे ऑस्ट्रेलियाने पुन्हा सामन्यावर पकड मजबूत केली आहे.
१२व्या षटकाअखेर भारत २ बाद ९० धावा
ॲडम झाम्पा डावातील आपले दुसरे षटक घेऊन आला, पण यावेळी त्याला मोठा फटका बसला. भारताचा डावखुरा फलंदाज शिवम दुबेने झाम्पाच्या या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर दणदणीत षटकार लगावला. दुबेच्या या आक्रमक खेळीमुळे ११ वे षटक भारतासाठी सर्वाधिक फलदायी ठरले. या षटकात भारताने एकूण १३ धावांची कमाई करत धावगतीला पुन्हा एकदा वेग दिला.
११व्या षटकाअखेर भारत १ बाद ८८ धावा
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने भारताच्या फलंदाजांवर दबाव ठेवला. त्याने टाकलेल्या डावातील दहाव्या षटकात भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी झुंजावे लागले. बार्टलेटने या षटकात तीन चेंडू निर्धाव टाकत आपल्या गोलंदाजीची अचूकता सिद्ध केली. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे भारताला या षटकात केवळ चार धावा जोडता आल्या.
१०व्या षटकाअखेर भारत १ बाद ७४ धावा
बेन ड्वारशुईसने डावातील नववे षटक टाकण्यासाठी चेंडू हाती घेतला, मात्र भारताचा फलंदाज शिवम दुबे याने त्याला पहिल्याच चेंडूवर चौकार फटकावत आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरील या चौकारानंतर गिल आणि दुबे या जोडीने उत्कृष्ट समन्वय दाखवत एकेरी आणि दुहेरी धावा काढण्यावर भर दिला, ज्यामुळे धावफलक हलता राहिला. या षटकात भारताला एकूण नऊ धावा मिळाल्या.
९व्या षटकाअखेर भारत १ बाद ७१ धावा
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोईनिसने गोलंदाजीत आपला ठसा उमटवत भारतीय फलंदाजांना चांगलेच बांधून ठेवले. त्याने डावातील आठवे षटक टाकले आणि या षटकात त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. स्टोईनिसच्या या प्रभावी माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा काढणे अत्यंत कठीण झाले. या षटकात त्याने केवळ चार धावा दिल्या आणि भारतावरचा दबाव कायम ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली.
७व्या षटकाअखेर भारत १ बाद ६२ धावा
ॲडम झाम्पाने आपल्या फिरकीची जादू दाखवत भारताला पहिला झटका दिला. डावाच्या ६.४ व्या षटकात त्याने सलामीवीर अभिषेक शर्माला (२८ धावा) टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. झाम्पाने ही महत्त्वाची विकेट घेत सलामीची भागीदारी संपुष्टात आणली. अभिषेक शर्माने झाम्पाच्या षटकाच्या दुस-त्याच चेंडूवर षटकार मारा. त्यानंतरचा चेंडू खेळून काढला. पण पुन्हा त्याने पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाम्पाचा हा चेंडू हुशारीचा नमुना ठरला. त्याने चेंडूची गती कमी (८२.२ किमी/तास) ठेवत 'टॉस अप' टाकला. या चेंडूला फटकावण्यात अभिषेकला आवश्यक शक्ती आणि पुरेसे अंतर मिळवता आले नाही. परिणामी, लाँग-ऑनजवळ उभ्या असलेल्या टिम डेव्हिडने खाली वाकून एक सुरेख झेल घेतला.
अभिषेक शर्मा २८ धावा (२१ चेंडू, ३ चौकार, १ षटकार)
७व्या षटकाअखेर भारत १ बाद ५८ धावा
६.१ व्या षटकात शुबमन गिलने ॲडम झाम्पाच्या चेंडूवर एकेरी धाव घेऊन भारताचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरच्या पुढच्याच चेंडूवर अभिषेक शर्माने क्रिज सोडून पुढे सरसावत समोरच्या बाजूला उत्तुंग षटकार ठोकला.
शुभमन गिलने अखेर दबाव झुगारून टाकला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी फळीतील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेल्या नॅथन एलिसला लक्ष्य केले. गिलला आता योग्य लय गवसली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अभिषेक शर्माला शांत ठेवण्यात यश मिळवले आहे.
भारत: ४ षटकांत बिनबाद ३१ धावा
दुसऱ्या बाजूने बेन ड्वारशुईसचा मारा सुरूच आहे आणि या षटकात सात धावा जमा झाल्या. शुभमन गिलने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला, पण त्याच्या खेळात अजूनही आत्मविश्वासाची कमतरता जाणवत आहे. त्याला आता मोठे फटके मारण्याची नितांत आवश्यकता आहे.
भारत: ३ षटकांत बिनबाद २० धावा
अभिषेक शर्माने दुस-याच षटकात सुरुवातीलाच दबाव झुगारून टाकला. त्याने झेवियर बार्टलेटच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत धावसंख्येला गती दिली. दुसरीकडे, शुभमन गिलवर मात्र दबाव जाणवत होत. त्याने ५ चेंडूंमध्ये केवळ २ धावा केल्या होत्या. त्याला दबावमुक्त होण्यासाठी आता काही चौकार मारण्याची गरज आहे.
भारत: २ षटकांत बिनबाद १३ धावा
बेन ड्वारशुईसचीने नव्या चेंडूने डावाची सुरुवात केली. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय सलामीवीरांना हात मोकळे करण्याची संधी दिली नाही. पहिल्या षटकात केवळ तीन धावा आल्या, ज्यामुळे शुभमन गिलवर दबाव वाढला.
भारतासाठी समाधानाची बाब म्हणजे अभिषेक शर्माने टी२० मधील विश्वक्रमांक एकचा फलंदाज ही आपली प्रतिष्ठा सिद्ध करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संघ त्याच्याकडून आणखी एका आक्रमक सलामीची अपेक्षा करत आहे. दुसरीकडे, कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. आता तो एका मोठ्या खेळीसह मालिकेत निर्णायक आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याला एक महिन्याचा विश्राम मिळणार असल्याने, हा सामना त्याच्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. या विश्रांतीनंतर सूर्यकुमार मुंबईकडून रणजी करंडक स्पर्धेत पुडुचेरीविरुद्ध खेळेल, अशी अपेक्षा आहे.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, जोश फिलिप, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अॅडम झांपा, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, बेन ड्वारशुईस.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी संघात चार महत्त्वपूर्ण बदल केल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये अॅडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल, जोश फिलिप आणि बेन ड्वारशुईस यांचा संघात पुनरागमन झाले आहे. अॅशेस मालिकेच्या तयारीसाठी ट्रॅव्हिस हेडला संघातून 'रिलीज' केले आहे, तर शॉन अॅबॉट, मॅथ्यू शॉर्ट आणि कुहनेमन यांना बाहेर बसवण्यात आले आहे.
याउलट, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने सांगितले की, आम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच निवडली असती. त्यामुळे टॉस हरल्याने भारताचे फारसे नुकसान झाले नाही. विशेष म्हणजे, भारतीय संघाने आपल्या प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.