पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई : आयपीएल २०२२ हंगामात आज चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मुंबईविरूध्दच्या सामन्यात चेन्नईने रोमहर्षक विजय मिळवला होता. आज सीएसके ही विजयी पताका कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. तसेच पंजाब विरूद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सीएसके काढण्यासाठी मैदानात उतरेल. पंजाबाला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. गेल्या सात सामन्यात पंजाबला फक्त तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे. गुणतालिकेमध्ये ते सहा गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. तर चेन्नई सुपर किंग्ज चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही, तर पंजाब किंग्जने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. शाहरूख खान, वैभव अरोरा आणि नॅथन अॅलिस यांनी बेंचवर बसवून त्यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना पंजाबने ४ गडी गमावून १८८ धावा केल्या. १८८ धावांचे लक्ष उभारताना शिखर धवनने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे पंजाबने ही धाव संख्या उभी केली.