
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताला चार गडी राखून पराभूत केले आहे. विजयासाठी मिळालेले १२६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १३.२ षटकांत केवळ सहा गडी गमावून सहजपणे पूर्ण केले. या विजयासह 'कांगारू' संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता तिसरा टी-२० सामना येत्या २ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
दुस-या टी-२० मधील विजय हा ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत सोपा होता. सामन्याच्या शेवटच्या क्षणी गेलेल्या विकेट्समुळे सामन्यात रंजकता आली पण हे बळी फार उशिरा मिळाले असल्याने भारताने पॉवरप्लेमध्येच सामना गमावला होता. कारण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच विजयाचा पाया रचला होता.
ट्रॅविस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. या जोडीने भारताला कोणतीही संधी दिली नाही. विशेषतः मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांची धुलाई करण्यात कसलीच कसर सोडली नाही. वरुण चक्रवर्तीने हेडला बाद केल्यानंतर मार्शने कुलदीपला जोरदार फटका मारला, पण तो त्याच षटकात बाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने काही विकेट्स गमावल्याने त्यांना थोडा संघर्ष करावा लागला, पण विजयाबद्दल कोणतीही शंका नव्हती. ऑस्ट्रेलियाने भरपूर चेंडू शिल्लक ठेवून हे लक्ष्य पार केले.
तत्पूर्वी, हेझलवूडने भेदक गोलंदाजी करत सुरुवातीलाच गोलंदाजांसाठी आधार तयार केला आणि त्यानंतर भारतासाठी धावा करणे कठीण राहिले.
तत्पूर्वी, हेझलवूडने भेदक गोलंदाजी करत सुरुवातीलाच गोलंदाजांसाठी आधार तयार केला आणि त्यानंतर भारतासाठी धावा करणे कठीण राहिले.
भारताची फलंदाजी :
भारताकडून अभिषेक शर्माने ३७ चेंडूंमध्ये ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला हर्षित राणाने ३५ धावा करून चांगली साथ दिली. मात्र, या दोघांव्यतिरिक्त अन्य एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. उर्वरित नऊ खेळाडूंपैकी चार फलंदाजांना तर आपले खातेही उघडता आले नाही.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने भेदक मारा करत सर्वाधिक तीन बळी घेतले. तर, जेवियर बार्टलेट आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळवले. स्टोइनिसला एक बळी मिळाला.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी :
१२६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी तूफानी सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची दमदार भागीदारी रचली. या भागीदारीला वरुण चक्रवर्तीने सुरुंग लावत हेडला बाद केले. हेडने १५ चेंडूंमध्ये तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावांची स्फोटक खेळी केली. दुसरीकडे, मिचेल मार्शला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने २६ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने ४६ धावा केल्या. जोश इंग्लिसने २० धावांचे योगदान दिले, तर टिम डेव्हिडला केवळ एक धाव करता आली.
या पराभवामुळे शिवम दुबेची २०१९ पासूनची टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील ‘अपराजित मालिका’ संपुष्टात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील १३व्या षटकात जसप्रीत बुमराहसठी हॅट्ट्रिकची संधी निर्माण झाली होती. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर मिचेल ओवेनला यष्टीरक्षक सॅमसनकरवी झेलबाद केले. ओवेन केवळ १४ धावा करू शकला. त्यानंतर, पाचव्या चेंडूवर त्याने मॅथ्यू शॉर्टला एका उत्कृष्ट यॉर्करवर क्लीन बोल्ड केले. शॉर्टला आपले खातेही उघडता आले नाही. या दोन महत्त्वाच्या विकेट्समुळे सामना रोमांचक वळणावर आला. पण यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज होती.
कुलदीप यादवने जॉश इंग्लिसला पायचीत बाद केले. पहिला अपिल केल्यानंतर मैदानी पंचांनी 'नॉट आऊट' दिले होते, परंतु भारताने रिव्ह्यू घेतला आणि तो निर्णय बदलला गेला. हा चेंडू लेग-स्टंपच्या बाहेर पडलेला वाटत होता, पण प्रत्यक्षात तो सरळ रेषेत पडला होता. चेंडू वेगाने पुढे सरकला आणि जॉश इंग्लिसने तो पंच करण्यासाठी बॅकफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. चेंडू पॅडवर आदळला आणि त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला. भारताला उशिरा का होईना एक महत्त्वाचा बळी मिळाला. जॉश इंग्लिसने २० धावा केल्या.
कुलदीप यादवचा एक चेंडू मिचेल ओवेनने फटकावला. हा फटकावलेला चेंडू उंच उडाला होता. डीप मिड-विकेटवरून धावत आलेल्या हर्षितकडून हा झेल निसटला. हा चेंडू मिडल स्टंपवर लांबीवर होता. मिचेल ओवेनने मागे सरकत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू बॅटच्या वरच्या जाड किनाऱ्याला लागला. डीपमधून हर्षित धावत आला, तर मिड-विकेटवरून वरुण मागे सरकला आणि त्याने तो झेल हर्षितसाठी सोडून दिला. हा झेल घेणे कठीण होते आणि दोन्ही हात चेंडूपर्यंत पोहोचूनही, हर्षितने तो सोडला.
वरुण चक्रवर्तीला दुसरी विकेट मिळाली. त्याने टिम डेव्हिडला अवघ्या १ धावेवर बाद केले आहे. ९० धावांच्या स्कोरवर ऑस्ट्रेलियाला हा तिसरा झटका बसला होता. वरुणची ही या सामन्यातील दुसरी मोठी विकेट ठरली. यापूर्वी त्याने खतरनाक ट्रेविस हेडला देखील बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाचा स्कोर: ३ बाद ९० धावा
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांवर आक्रमण करत धावा वसूल केल्या. त्याने हेड सोबत अर्धशतकी भागिदारी केली. हेड बाद झाल्यानंतरही त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. 8वे षटक कुलदीप यादव घेऊन आला. त्यातील पहिल्या चेंडूवर त्याने दोन चौकार आणि दोन षटकार खेचले. पण शेवटच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. हा चेंडू मार्शच्या आवाक्याबाहेर होता. त्याने पुढे येत चेंडू हवेत टोलवण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकीच्या पद्धतीने मारला गेला. लॉन्ग-ऑफवर उभ्या असलेल्या अभिषेक शर्मासाठी हा सोपा झेल होता आणि त्याने सीमारेषेवरून धावत येऊन तो पकडला. ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट ठरली. मार्शने २६ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकार ठोकून ४६ धावा तडकावल्या.
पहिल्या चार षटकांत ४९ धावा खर्च केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला ट्रम्प कार्ड असलेला वरुण चक्रवर्ती याच्या हाती चेंडू सोपवला. वरुणने आपल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर धोकादायक ट्रेविस हेडचा बळी घेत भारताला पहिली आणि मोठी सफलता मिळवून दिली. हेडने १५ चेंडूंमध्ये २८ धावांची ताबडतोड खेळी केली.
ऑस्ट्रेलियाचा स्कोर १ बाद ५१
ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या चार षटकांतच ४९ धावा फटकावल्या. ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या चार षटकांतच सामना भारताच्या पकडीतून दूर नेला.
जसप्रीत बुमराह पहिल्या षटकात लयीत दिसत होता, पण दुसऱ्या षटकात तो पूर्णपणे लय हरवलेला दिसून आला. त्याच्या या दुसऱ्या षटकात तब्बल १८ धावा जमा झाल्या. यामध्ये एक चौकार, एक दुहेरी धाव आणि एक तिहेरी धाव यांचा समावेश होता. तसेच, त्याने वाईडवर चौकार देऊन पाच अतिरिक्त धावा खर्च केल्या.
३ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर: २९/०
पहिल्या षटकात जसप्रीत बुमराहने चार धावा दिल्या होत्या, तर हर्षित राणाने आपल्या पहिल्या षटकात एका चौकारासह ७ धावा खर्च केल्या. ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे.
२ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर: ११/०
जसप्रीत बुमराहने पहिले षटक टाकून डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर, कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड क्रीजवर उतरले. पहिल्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीसमोर या दोन्ही खेळाडूंनी समजूतदारपणे खेळ केला आणि ते कोणत्याही अडचणीत दिसले नाहीत.
पहिल्या षटकानंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर: ४/०
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांना खेळपट्टीच्या उसळीसमोर अक्षरशः झुकावे लागले. जोश हेझलवूडच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर भारताचा संपूर्ण डाव १८.४ षटकांत १२५ धावांवर आटोपला.
अपवाद अभिषेक-हर्षित!
भारताच्या डावात फक्त दोनच फलंदाज लक्षणीय योगदान देऊ शकले. युवा फलंदाज अभिषेक शर्माने ३७ चेंडूंमध्ये ६८ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर हर्षित राणाने ३३ चेंडूंमध्ये संयमी ३५ धावा जोडल्या. मात्र, या दोघांना वगळता उर्वरित फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. उर्वरित फलंदाजांनी मिळून ५० चेंडूंमध्ये केवळ २२ धावा काढल्या.
शीर्ष फळी अपयशी
खेळपट्टीवर असलेला अतिरिक्त उसळीचा (बाउन्स) आणि सीम मूव्हमेंटचा अंदाज घेण्यास भारतीय संघाची शीर्ष फळी पूर्णपणे अपयशी ठरली. पण त्याचवेळी अभिषेक शर्मा क्रीजमध्ये हुशारीने हालचाल करत चेंडूच्या वेगाचा योग्य वापर करताना दिसला. परंतु, इतर फलंदाज मात्र क्रीजवर अक्षरशः अडकून पडले. त्यांना चेंडूच्या वेगळ्या टप्प्याशी आणि तीव्र उसळीशी जुळवून घेणे शक्य झाले नाही.
हेझलवूडचा 'टेस्ट मॅच' मारा
ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने यावेळी गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्याने कसोटी सामन्याला साजेशा लाईन आणि लेंथचा वापर करत आधुनिक फलंदाजांना मोठे आव्हान दिले. हेझलवूडने आपल्या सुरुवातीच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये तब्बल १५ निर्धाव चेंडू टाकून भारतीय फलंदाजांवर दबाव वाढवला, ज्यामुळे भारतीय संघाची धावगती मंदावली आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.
एलिसने १८.४ व्या षटकात बुमराहला धावबाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. अभिषेक बाद झाल्यानंतर बुमराह मैदानात आला. गोलंदाजाने धीम्या गतीचा चेंडू टाकला. बुमराहने तो चेंडू खेळपट्टीच्या अगदी जवळ खेळला. त्याचवेळी त्याने वरुण चक्रवर्तीला धाव घेण्यास कॉल केला. पण वरुणने धाव घेण्यास नकार दिला. बुमराह खेळपट्टीच्या अर्ध्यापर्यंत पोहोचला होता आणि त्याला मागे फिरावे लागले. एलिसने वेगाने पुढे येत सहजपणे त्याला धावबाद केले. बुमराहला खातेही उघडता आले नाही.
एलिसने फेकलेला 19 व्या षटकचा दुसरा चेंडू अभिषेक शर्माच्या पायावर आदळला. जोरदार अपिल झाले. पंचांनी बोट वर करत फलंदाज बाद असल्याचा कौल दिला. पण अभिषेकने रिव्ह्यू घेतला. पण त्यातही तिस-या पंचांनी अभिषेक बाद असल्याचे स्पष्ट केले.
स्टोइनिसने कुलदीप यादवची विकेट घेऊन भारताला आठवा धक्का दिला. ॲबॉटने शॉर्ट मिड-विकेटवर उत्कृष्ट सूर मारून झेल घेतला. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू कुलदीपने पुल करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या टोकाला लागला. ॲबॉटने सूर मारला आणि जमिनीपासून काही इंच वर असताना तो झेल टिपला. कुलदीप यादवला खातेही उघडता आले नाही.
भारतीय संघाला शिवम दुबेच्या रूपाने हा सातवा मोठा झटका बसला. जेवियर बार्टलेटने एकाच षटकात दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताला पुन्हा एकदा अडचणीत आणले. या षटकाच्या सुरुवातीला प्रथम स्थिरावलेला हर्षित राणा ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर, जॉश इंग्लिसने घेतलेल्या उत्कृष्ट झेल पकडल्यामुळे शिवम दुबे अवघ्या २ चेंडूंमध्ये ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या बाजूला, अभिषेक अजूनही ५२ धावांवर एक बाजू सांभाळत उभा आहे आणि त्याला साथ देण्यासाठी कुलदीप यादव मैदानात आला आहे.
१५.२ व्या षटकात भारताला सहावा झटका बसला. बार्टलेटने हर्षित राणाची विकेट घेतली. टिम डेव्हिडने झेल पकडला.
शॉर्ट पिच केलेला आणि गती कमी असलेला चेंडू होता, जो खेळपट्टीवर मागे पडला. हर्षितने ऑफ-साईडवरून हा चेंडू लांब खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने मैदानावरील सीमारेषा पार करण्याचा त्याने विश्वास ठेवला होता, पण तो झेल देऊन बसला. बार्टलेटने हाताच्या मागच्या बाजूचा वापर करत चेंडूची गती कमी केली होती. हर्षित आधीच लेग-साईडच्या दिशेने उभा असल्यामुळे त्याला चेंडूपर्यंत पोहोचणे भाग पडले आणि चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला. तरीही, त्याने चांगला संयम दाखवला. शेवटच्या काही चेंडूंवर त्याने कदाचित वेळ वाया घालवला असेल, पण अभिषेक शर्माला योग्य साथ देण्यासाठी तो खेळपट्टीवर टिकून राहिला. हर्षित राणाने ३ चौकार आणि १ षटकार मारत ३५ (३३ चेंडू) धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.
१२.३ व्या षटकात अभिषेक शर्माने मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर एक धाव पूर्ण करत अर्धशतक पूर्ण केले. यासह मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमधील प्रेक्षकांनी त्याच्या सहाव्या टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतकाचे जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.
एका बाजूला नियमितपणे साथीदार बाद होत असतानाही, इतक्या जलद गतीने आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करणे निश्चितच सोपे नाही. त्याच्या उत्कृष्ट टी२० खेळींपैकी हे एक नेत्रदीपक प्रदर्शन आहे. अभिषेकने प्रेक्षकांच्या या उत्साही प्रतिसादाचा स्वीकार करण्यासाठी त्याची बॅट उंचावली आणि विनम्रता दर्शवली.
१३ षटकाअखेर भारताची धावसंख्या ५ बाद ९२ झाली.
बार्टलेटच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल धावबाद झाला. हा भारतीय संघासाठी एक अनावश्यक धावबाद ठरला, जो दोन फलंदाजांमधील विस्कटलेल्या समन्वयामुळे झाला.
गोंधळात विकेट गेली: अक्षर पटेलने पहिली धाव घेण्यास सुरुवातीला थोडा विलंब केला. मात्र, त्याला तिसरी धाव घेता येईल असे वाटले. पण, नॉन-स्ट्रायकर एंडवरील अभिषेक शर्मा केवळ दोन धावांवर समाधानी होता. त्यामुळे अभिषेकने तिसरी धाव नको म्हणून हात उंचावून अक्षरला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत अक्षर पटेल पिचच्या मध्यभागी पोहोचला होता. त्याचवेळी माघारी जाताना तो घसरला. तशात परिस्थितीत त्याने पुन्हा क्रिज गाठण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याने डाइव्ह देखील मारला. पण तो क्रीजच्या आत पोहोचू शकला नाही आणि बाद झाला.
टीम डेव्हिडची चपळाई : टीम डेव्हिडला सुरुवातीला धावबादची शक्यता वाटली नाही. मात्र, फलंदाज तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहताच त्याने झटपट आणि अचूक थ्रो यष्टिरक्षक जॉश इंग्लिसकडे फेकला आणि इंग्लिसने उर्वरित काम पूर्ण केले. अक्षर पटेलने केवळ ७(१२ चेंडू) धावा केल्या.
अवघ्या ७.३ चेंडूत भारताने पाच विकेट गमावल्या आहेत. अक्षर पटेलच्या रुपात भारताला पाचवा झटका बसला. तो तिसरी धाव चोरण्याच्य नादात धावचित झाला.
हेजलवुडने आपला प्रभावी मारा कायम ठेवत भारताच्या फलंदाजीला लागोपाठ धक्के देण्याचे काम केले. त्याने तिलक वर्माचाही काटा काढला.
फटका मारण्याचा प्रयत्न फसला : तिलक वर्माला यष्टीवरील लेंथ डिलिव्हरीवर लेग-साइडला फटका मारायचा होता. परंतु, त्याने आडव्या रेषेत येत जोरदार फटका खेळला. या प्रयत्नात चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उंच उडाला. शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने जाणारा हा सोपा झेल विकेटकिपर इंग्लिसने धावत जाऊन सहज टिपला. हेजलवुडच्या अचूक लेंथ आणि लाईनमुळे भारतीय फलंदाजी पुरती डळमळीत झाली आहे. मेलबर्न येथील मैदानावर भारतीय फलंदाजांना चेंडूचा बाऊन्स आणि सीम मूव्हमेंट याचा सामना करणे अशक्य झाले आहे.
हेजलवुडच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव बाद झाला. विकेटच्या मागे जॉश इंग्लिसने झेल घेतला. हा टी२० फॉरमॅटमधील एका स्टार फलंदाजाला 'कसोटी क्रिकेटमधील बाद' होण्याचा प्रकार ठरला. हेजलवुडने टाकलेला हा चेंडू खेळण्यास अत्यंत कठीण होता. ऑफ स्टंपच्या आसपास टप्पा पडून वेगाने आत येऊन नंतर बाहेरच्या दिशेने निसटणारा हा 'शॉर्ट ऑफ लेंथ'चा चेंडू होता. या चेंडूपुढे सूर्यकुमार यादव पूर्णपणे गोंधळला. त्याने 'बाप रे, हा खूपच चांगला चेंडू आहे' अशा अविर्भावात बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी बॅटची बाहेरील जाड कड घेऊन चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हातात गेला. सूर्याने केवळ १ धाव केली.
नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर सॅमसन पायचीत बाद झाला. सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याचा हा प्रयोग पूर्णपणे फसला. एलिसने टाकलेला हा चेंडू वेगाने आत आला आणि थेट सॅमसनच्या मागील पायावर आदळला. यापूर्वी गिलने रिव्ह्यू घेऊन स्वत:ला वाचवले होते. मात्र, येथे संजू क्रीजमध्ये खूप आत जाऊन जाऊन हा फुलिश चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता. एलिसच्या या चेंडूने सॅमसनला थेट मध्य यष्टीसमोर अडकवले. 'बॉल-ट्रॅकर'नुसार, चेंडू थेट लेग स्टंपवर आदळल्याचे स्पष्ट झाले. सॅमसन २(४) धावा करून माघारी परतला.
सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून बिचकत फलंदाजी करणा-या शुबमन गिलचा हेजवूडच्या मा-यापुढे निभाव लागला नाही. तो तिस-या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. हेजलवुड सध्या ऑस्ट्रेलियासाठी 'गोल्डन आर्म' असलेला गोलंदाज ठरत आहे. त्याने टाकलेला हा चेंडू फलंदाजीसाठी अगदी 'स्लॉट'मध्ये होता, हे शुभमन गिललाही मान्य करावे लागेल. नेमकी तीच चूक झाली. चेंडू 'स्लॉट'मध्ये असल्यामुळे गिलने मिड-ऑफवरून उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या खालील कडेला लागला. फटका व्यवस्थित न बसता, चेंडू बॅटच्या अगदी खालच्या भागावर आदळला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने रिंगमधून काही पाऊले मागे जात हा सोपा झेल घेतला. आपली विकेट गमावल्यामुळे शुभमन गिल स्वतःवर खूप संतापलेला दिसला. त्याने १० चेंडूत केवळ ५ धावा केल्या
पहिल्या षटकात हेजलवूनने भेदक मारा केला आणि केवळ एक धाव दिली. यानंतर बार्लेटने फेकलेल्या दुस-या षटकात अभिषेक शर्माने आक्रमकता दाखवत फटकेबाजी केली. चौथ्या चेंडूवर चौकार तर सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकात एकूण १७ धावा मिळाल्या.
भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल सामन्यातील पहिल्याच चेंडूवर पायचीत (LBW) होण्यापासून थोडाक्यात बचावला. हेजलवुडच्या पहिल्याच भेदक चेंडूवर तो पूर्णपणे बीट झाला आणि मैदानी पंचांनी त्वरित बोट वर करत त्याला बाद घोषित केले. मात्र, गिलने अभिषेक शर्माशी चर्चा करून तत्काळ डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये चेंडू यष्टिच्या खूप वरून जात असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे तो बाद नसल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे गिलला जीवदान मिळाले. हा त्याच्यासाठी एक थरारक बचाव ठरला. या जीवदानानंतरही त्याची फलंदाजी काहीशी डळमळीत राहिली. तो दुसऱ्या चेंडूवरही बीट झाला, तर तिसरा चेंडू थेट त्याच्या डोक्यावरील हेल्मेटवर आदळला.
ऑस्ट्रेलियाचा देशांतर्गत १७ वर्षीय क्रिकेटपटू बेन ऑस्टिनच्या दु:खद निधनामुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. या युवा खेळाडूला श्रद्धांजली वाहण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील खेळाडूंनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सामना सुरू होण्यापूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्री लाईनजवळ दोन मिनिटे शांत उभे राहून मौन पाळले. ऑस्टिनचे निधन सराव करत असताना, मानेवर चेंडू लागल्यामुळे झालेल्या अपघातात झाले. त्याच्या स्मृतीचा आदर म्हणून, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर काळ्या रंगाची पट्टी बांधून उतरले.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आज होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टी२० सामन्यासाठी दोन्ही संघांचे अंतिम ११ खेळाडू निश्चित झाले आहेत. संघ व्यवस्थापनाने काही महत्त्वपूर्ण बदल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाने पहिल्या सामन्याच्या तुलनेत आपल्या रचनेत फारसे बदल केलेले नाहीत. कर्णधार सूर्यकुमार यादवने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीवर अधिक भर दिला आहे.
भारत (Playing XI) : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाच्या संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गोलंदाजीत झेवियर बार्टलेट याला संधी मिळाली आहे, तर फलंदाजीत मॅथ्यू शॉर्ट याचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया (Playing XI) : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेजलवूड.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा टॉस हरला. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सूर्यकुमार यादव या निर्णयामुळे निराश दिसला नाही. त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही टॉस जिंकला असता तर प्रथम फलंदाजीच केली असती.
सर्व खेळाडू मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) दाखल झाले आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू कसून सराव करत आहेत. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव देखील खेळपट्टीवर शैडो प्रॅक्टिस करताना दिसला. तसेच, अभिषेक शर्मा थ्रो डाऊन घेताना आढळला. सध्या पाऊस थांबलेला असला तरी आकाश ढगाळ आहे, म्हणजेच पावसाचे संकट अजूनही कायम आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेची सुरुवात कॅनबेरा येथे पावसामुळे निराशाजनक झाली. अवघ्या ५८ चेंडूंनंतर पावसाने खेळावर वर्चस्व गाजवले आणि अखेर सामना रद्द झाला. त्या कमी वेळेत, भारताचे फलंदाज नशिबाची साथ मिळाल्यासारखे खेळताना दिसले. कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला सूर पुन्हा गवसल्याचे संकेत दिले, तर शुभमन गिलने त्याला दुसऱ्या टोकावरून उत्कृष्ट साथ दिली. मात्र, अखेर या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले आणि आता दोन्ही संघ एका ताज्या सामन्यासाठी सज्ज आहेत. ही मालिका आता चार सामन्यांची झाली असून, त्याची सुरुवात आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) या भव्य मैदानात होणार आहे.
अलीकडच्या काळात, या फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी एमसीजीच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. पण याचा अर्थ असा नाही की भारत आपोआपच फेव्हरिट म्हणून मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाला येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे आणि क्रिकेटच्या या भव्य मैदानात त्यांच्या स्वतःच्या दमदार युनिटसह भारताला कडवी टक्कर देण्यासाठी ते तयार असतील.