

आशिया कप टी-२० स्पर्धेत भारतीय संघाने संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघाचा एकतर्फी पराभव केला. यूएईने विजयासाठी ठेवलेले अवघ्या ५८ धावांचे लक्ष्य भारताने केवळ ४.३ षटकांत आणि फक्त एक गडी गमावून आरामात पूर्ण केले.
५८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल सलामीला आले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार आणि त्यानंतरच्या चेंडूवर चौकार ठोकत आपल्या आक्रमक इराद्यांचे संकेत दिले. त्याने पहिल्या षटकात १० धावा चोपल्या. अभिषेकने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवत अवघ्या १५ चेंडूत ३० धावा फटकावल्या. त्याच्या या धडाकेबाज खेळीत ३ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. जुनैद सिद्दीकीने त्याला बाद करून भारताला पहिला धक्का दिला.
त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार मारून भारतीय संघाची विजयाची भूक दाखवून दिली. दुसरीकडे, सलामीवीर शुभमन गिलने अभिषेकला चांगली साथ दिली आणि ९ चेंडूत १ षटकार आणि १ चौकार लगावत नाबाद २० धावा केल्या. गिलनेच विजयी चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
या सामन्यात भारताने केवळ २७ चेंडूतच लक्ष्य गाठले, ज्यामुळे क्रिकेट विश्वात एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनीही तुफानी खेळी करून हा विजय अधिक दिमाखदार बनवला.
भारताच्या घातक गोलंदाजीसमोर युएईचे फलंदाज आपली पकड टिकवू शकले नाहीत आणि संघ फक्त ५७ धावांवरच गारद झाला. त्यांच्या आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.
युएईचा डाव कर्णधार मोहम्मद वसीम आणि अलिशान शराफू यांनी सुरू केला, परंतु भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला. संघाला पहिला धक्का २६ धावांवर बसला, जेव्हा जसप्रीत बुमराहने अलिशान शराफू (२२ धावा) ला बाद केले. त्यानंतर २९ धावांवर दुसरा झटका बसला. मोहम्मद जोहेब (२ धावा) देखील वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद झाला.
नवव्या षटकात कुलदीप यादवने कहर केला. त्याने एकाच षटकात तीन बळी घेतले. यात राहुल चोप्रा (३), कर्णधार मोहम्मद वसीम (१९) आणि हर्षित कौशिक (२) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर युएईने ५० धावांवर पाच बळी गमावले.
शिवम दुबेने ५१ धावांवर सहावा धक्का दिला. त्याने आसिफ खान (२)ला बाद केले. त्यानंतर ५२ धावांवर अक्षर पटेलने सिमरनजीत सिंग (१)च्या रुपात बळी घेतला. हा युएईला सातवा झटका होता. लवकरच दुबेने ध्रुव पराशर (१) आणि जुनैद सिद्दीकी (२) यांनाही बाद केले. शेवटचा धक्का कुलदीप यादवने दिला. त्याने हैदर अली (१)ला संजू सॅमसन करवी झेलबाद केले.
भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर शिवम दुबेने ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना १-१ विकेट मिळाली.
शिवम दुबेने १३ व्या षटकात UAE ला दुहेरी धक्का दिला. त्याने पहिल्या चेंडूवर ध्रुव पराशर (१) आणि चौथ्या चेंडूवर जुनैद सिद्दीकी (०) ला LBW आउट केले.
युएईला ५२ धावांवर सातवा धक्का बसला. डावाच्या १२ व्या षटकात अक्षर पटेलने सिमरनजीत सिंगला एलबीडब्ल्यू बाद केले. तो फक्त एक धाव करू शकला.
कुलदीप यादवने नवव्या षटकात UAE च्या तीन विकेट घेतल्या. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर राहुल चोप्रा (७ चेंडूत ३) आणि चौथ्या चेंडूवर कर्णधार मोहम्मद वसीम (२२ चेंडूत १९) यांची विकेट घेतली. वसीमने रिव्ह्यू घेतला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर कुलदीपने शेवटच्या चेंडूवर हर्षित कौशिक (२ चेंडूत २) ला बाद केले. ९ षटकांनंतर UAE चा स्कोअर ५०/५ आहे.
कुलदीप यादवने नवव्या षटकात UAE ला दुहेरी धक्का दिला. त्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर राहुल चोप्रा (७ चेंडूत ३) आणि चौथ्या चेंडूवर कर्णधार मोहम्मद वसीम (२२ चेंडूत १९) यांचे बळी घेतले. वसीमने रिव्ह्यू घेतला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. UAE ने ५० धावांपूर्वी चार विकेट गमावल्या.
कुलदीप यादवने मुहम्मद वसीमला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यासह युएईचा कर्णधार माघारी परतला. वसीम स्वीप शॉट खेळायला गेला आणि पायचित बाद झाला. मुहम्मद वसीमने १९(२२) धावा केल्या
कुलदीप यादवची राहुल चोप्राला गोलंदाजी, झेलबाद झाला... हवेत उडालेला चेंडू लाँग-ऑनवर पकडला गेला. कुलदीप यादवने टाकलेला हा चेंडू फलंदाजाला मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त करणारा होता, आणि चोप्राने तो हेरला. त्याने लाँग-ऑनवरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चेंडू व्यवस्थित टाइम करता आला नाही, त्यामुळे चेंडूला आवश्यक अंतरही मिळाले नाही आणि गिलने उजवीकडे सरकत तो झेल सहज पकडला. यूएईचा तिसरा गडी बाद.
कुलदीप यादव गोलंदाजीसाठी आला आणि त्याने केवळ चार धावा देत एक प्रभावी षटक टाकले. सूर्यकुमार यादव यूएईच्या फलंदाजांना एकाच गोलंदाजासमोर स्थिरावू देत नाहीये. तो गोलंदाज सतत बदलत आहे. ७.३ षटकांत यूएईची धावसंख्या २ बाद ४५.
वरुण चक्रवर्तीने त्याच्या पहिल्याच षटकात मुहम्मद जोहैबला केवळ २ धावांवर बाद केले. यासह भारताला दुसरे यश मिळाले. भारताच्या दोन सर्वोत्तम गोलंदाजांनी सूत्रे हाती घेतल्याने आता यूएईचा डाव कोसळायला सुरुवात झाली. ४.४ षटकांत यूएईची धावसंख्या २ बाद २९ होती.
मुहम्मद वसीमने पहिल्या चेंडूवर वेळेनुसार फटका मारून चौकार मिळवला आणि त्यानंतर संथ उसळत्या चेंडूला लवकर ओळखत पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून चौकार मारला. त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर आणखी एक चौकार मारून या षटकातून १२ धावा वसूल केल्या.
यूएईला २६ धावांवर पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराहने अलिशान शराफूला बाद केले. १७ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २२ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्याच्यानंतर मोहम्मद झोहेब मैदानात उतरला.
अलीशान शराफूने अक्षर पटेलला लक्ष्य केले आणि त्याला एक्स्ट्रा-कव्हरवरून एक षटकार मारला. यूएईने भारताला अचंबित करणारी उत्कृष्ट सुरुवात केली. ३ षटकांनंतर यूएईची धावसंख्या बिनबाद २५ होती.
हार्दिक पंड्याने नव्या चेंडूसह महागडी सुरुवात केली. शराफूने पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि षटकाच्या उत्तरार्धात हल्ला करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या चेंडूवर स्लिपवरून चेंडू बॅटची कड घेऊन उडून गेला. यातून त्याला एक सुदैवी चौकार मिळाला. त्याने पाचव्या चेंडूवर पॉइंटवरून आणखी एक चौकार मारला. एका षटकानंतर यूएईची धावसंख्या बिनबाद १० होती.
भारताने युएईविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली आणि ताजी दिसते. ओलावा आहे, नंतर दव पडू शकते. जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही काहीही करण्यास तयार आहोत, पण आज आम्हाला गोलंदाजी करायची आहे. आम्ही येथे लवकर आलो. ३-४ चांगले सराव सत्र केले आणि एक दिवस सुट्टीही घेतली.
त्याच वेळी, युएईचा कर्णधार मोहम्मद वसीम म्हणाला की, खेळपट्टी ताजी आहे आणि कदाचित सुरुवातीला चेंडू काही हालचाल करेल. आम्ही चांगली मालिका खेळलो, अनेक सकारात्मक गोष्टी शिकलो आणि त्या मालिकेतून आम्हाला आत्मविश्वास आला आहे. आम्ही फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज, ज्युनियर आणि सीनियर खेळाडूंसह चांगल्या संयोजनासह मैदानात उतरत आहोत.
भारत : अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
संयुक्त अरब अमिराती : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मोहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मोहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग.
आशिया कप २०२५ चा आज दुसरा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघांमध्ये दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याद्वारे, दोन्ही संघांनी स्पर्धेतील त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. भारताने युएईविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.