IND vs SA Boxing Day Test: भारताला आठवा धक्का, जसप्रित बुमराह बाद | पुढारी

IND vs SA Boxing Day Test: भारताला आठवा धक्का, जसप्रित बुमराह बाद

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA Boxing Day Test : भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत भारताची टॉप ऑर्डर झटपट तंबूत पाठवली. सध्या भारताची धावसंख्या 59 षटकांत 8 बाद 208 आहे.

बुमराह बाद

जसप्रीत बुमराहच्या रूपाने भारताला आठवा धक्का बसला. त्याला मार्को जॅनसेनने बाद केले. बुमराहने 19 चेंडूत एक धाव काढली.

राहुलचे अर्धशतक

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने पहिल्या डावात आपले अर्धशतक पूर्ण केले.

भारताला सातवा धक्का

दक्षिण आफ्रिकेने भारताला सातवा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने त्याची पाचवी विकेट घेतली. त्याने अष्टपैलू शार्दुल ठाकूरला बाद केले.

रबाडाची चौथी विकेट

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले आहे. त्याने आर अश्विनच्या रुपात आपली चौथी विकेट घेतली. अश्विन 11 चेंडूत 8 धावा करून तंबूत परतला.

विराट कोहली बाद

भारताला आणखी एक धक्का बसला आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीही बाद झाला आहे. कोहली 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अवघ्या 107 धावांवर भारताची पाचवी विकेट पडली.

भारताला चौथा धक्का

लंच ब्रेकनंतर भारताला चौथा धक्का बसला. कागिसो रबाडाने 27व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला क्लीन बोल्ड केले. अय्यरने 50 चेंडूत 31 धावा केल्या. त्याने विराट कोहलीसोबत चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.

पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला असून भारताने 26 षटकांत 3 विकेट गमावून 91 धावा केल्या होत्या. संघाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर नाबाद परतले होते. दोघांमध्ये 64 धावांची भागीदारी झाली होती.

टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडली

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या केवळ 13 असताना रोहित शर्मा आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सर्व आशा शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर होत्या. पण 23 धावांवर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वालही (37 चेंडूत 17 धावा) बाद झाला. त्यानंतर लगेच 24 धावांवर गिल (1) माघारी परतला. अशाप्रकारे 25 धावा पूर्ण होण्याआधीच भारतीय संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.

कोहली-अय्यरला जीवदान, दोघांनी सांभाळला टीम इंडियाचा डाव

या कठीण काळात कोहली आणि श्रेयस अय्यर ही जोडी भारतीय संघासाठी पहिल्या सत्रा अखेर पर्यंत संकटमोचक ठरली. दोघांनी संयमी खेळी केली. दोघांनी एकेरी दुहेरी धावा करत धावफलक हलता ठेवला. यादरम्यान त्यांनी खराब चेंडू सीमा पोहवले. पण या खेळी दरम्यान, अय्यर आणि कोहलीला सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रत्येकी एक जीवदान मिळाले. 13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर श्रेयसने पॉइंटच्या दिशेने एक शॉट खेळला, इथे मार्को जॅन्सनला त्याचा झेल घेता आला नाही. 14व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विराटने स्क्वेअर लेगच्या दिशेने एक शॉट खेळला, जिथे टोनी डी जॉर्जीकडून झेल चुकला.

या सामन्यातून शार्दुल ठाकूरने पुनरागमन केले आहे. तर, प्रसिद्ध कृष्णा भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. भारतीय संघात रवींद्र जडेजाला विश्रांती देत रवीचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले आहे. यासह द. आफ्रिकाकडून डेव्हिड बेडिंगहॅम आणि नांद्रे बर्जर यांनी द. आफ्रिकेकडून पदार्पण केले आहे. (IND vs SA Test)

टीम इंडियाला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. येथील खेळपट्टीचा वेगवान गोलंदाजांना फायदा होतो. भारताने या मैदानावर तीन कसोटी सामने खेळले असून यात एक विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यांनामध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सेंच्युरियन कसोटीचे पहिले दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. अशा स्थितीत येथे प्रथम खेळणाऱ्या संघासमोर आव्हान असेल. (IND vs SA Test)

सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिका आजपासून सुरूवात होत आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.  सामन्यात वरूण राजाने हजेरी लावल्याने टॉसला विलंब झाला. सततच्या पावसामुळे सेंच्युरियनमधील मैदान ओले झाले. जोरदार पावसामुळे मैदानावर अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.  यामुळे टॉसला विलंब झाला.

सेंच्युरियनमध्ये भारताचे आव्हान तीन मुख्य गोष्टींवर अवलंबून असेल. कर्णधार रोहित शर्माचे त्याच्या पुल आणि हुक शॉट्सवर कोणते नियंत्रण ठेवू शकतो की नाही? दुसरे म्हणजे, विराट कोहली ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणार्‍या चेंडूंशी छेडछाड करतो की नाही आणि तिसरे म्हणजे, मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो.

 

हेही वाचा :

Back to top button