Ganguly on Kohli : सौरव गांगुलीचे कोहलीबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला; ‘मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही, त्याने…’

Ganguly on Kohli : सौरव गांगुलीचे कोहलीबाबत मोठे वक्तव्य, म्हणाला; ‘मी विराटला कर्णधारपदावरून हटवले नाही, त्याने…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ganguly on Kohli : 'विराट कोहलीला मी कधीही टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यास सांगितले नाही. खरेतर एकदिवसीय आणि कसोटी संघांच्या कर्णधार पदी कायम राहून टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार व्हायचे होते. त्याने तशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर मी विराटला स्पष्ट केले की, जर तुला तुला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडायचे असेल तर तुला इतर दोन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचाही राजीनामा द्यावा लागेल. व्हाईट बॉल क्रिकेट फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार असू शकत नाहीत, असे बोर्डाचे मत होते,' असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने विराट कोहलीसोबतच्या 'कॅप्टन्सी' वादावर पुन्हा एकदा खुलासा केला आहे.

2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी त्याने एकदिवसीय आणि कसोटीत संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच्या या निर्णयावर बीसीसीआय खूश नव्हते. त्या सर्व प्रकरणावर तत्कालीन बीसीसीआयचा तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुलीने मौन सोडले आहे. तो म्हणाले की, मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवले नाही. त्याने टी-20 चे कर्णधारपद सोडले असल्याने आम्ही त्याला सांगितले होते की, तसे असेल तर त्याने वनडेचे कर्णधारपदही सोडावे, कारण पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटमध्येच वेगळे कर्णधार असू शकत नाहीत.' (Ganguly on Kohli)

जेव्हा विराट कोहलीकडून एकदिवसीय कर्णधारपद काढून घेण्यात आले होते, त्यानंतर काही काळानंतर त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कोहलीने एका स्फोटक पत्रकार परिषदेत यावर खुलासा केला की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडीच्या अवघ्या 90 मिनिटांपूर्वी त्याला या निर्णयाची माहिती देण्यात आली होती. त्याने गांगुलीच्या दाव्याचे खंडन केले की बोर्डाने त्याला टी-20 कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. कोहलीने सांगितले की, अशी कोणतीही विनंती मला करण्यात आली नव्हती आणि विश्वचषकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या इराद्यांबद्दल तो स्पष्ट होता. निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा यांनी कोहलीच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया दिल्याने हा वाद आणखी वाढला. शर्मा यांनी भर दिला की कोहलीला काढून टाकण्याचा निर्णय निवडकर्त्यांच्या विश्वासावर आधारित होता की व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी एकसंध दृष्टीकोन आवश्यक आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, बीसीसीआय पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी कोहलीला आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी टी-20 कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. (Ganguly on Kohli)

कोहलीनंतर बीसीसीआयने रोहित शर्माला सर्व फॉरमॅटचा कर्णधार बनवले होते, जरी रोहित शर्माही काही काळापासून टी-20 फॉरमॅट खेळत नव्हता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news