पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमन झाले असून बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याचा संघात समावेश केला आहे.
भारतीय संघाला मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि वन डे सामन्यांची मालिका खेळायची आहे. 3 ते 8 जानेवारीपर्यंत टी 20 मालिकेतील तीन सामने होणार आहेत. त्यानंतर 10 ते 15 जानेवारी पर्यंत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.
मंगळवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (NCA) बुमराहला (Jasprit Bumrah) तंदुरुस्त असल्याचे घोषित केले. त्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत त्याची 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड केली. बुमराह शेवटचा सामना मागिल वर्षी सप्टेंबरमध्ये खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी-20 विश्वचषकही खेळला नव्हता.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.