West Indies vs India 5th T20I भारताने वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी केली मात

West Indies vs India 5th T20I भारताने वेस्ट इंडिजवर ८८ धावांनी केली मात
Published on
Updated on

फ्लोरिडा; पुढारी ऑनलाईन : वेस्ट इंडिज (West Indies vs India 5th T20I) दौऱ्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी २० सामन्यात भारताने विंडिजवर ८८ धावांनी मात केली. भारताने ठेवलेल्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ १०० धावात गारद झाला. चौथ्या सामन्यातच भारताने मालिका विजय नोंदविला होता. त्यानंतर पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा भारताने विजय नोंदवून वेस्ट इंडिजला मालिकेत ४-१ असे पराभूत केले. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी सर्वच्या सर्व बळी घेत अवघ्या १६ व्या षटकात वेस्ट इंडिजचा १०० धावांवर डाव संपवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news