दक्षिण आफ्रिका पुन्हा लकी, टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

दक्षिण आफ्रिका पुन्हा लकी, टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाने मालिकेतील प्रत्येकी दोन सामने आपल्या नावावर केले आहेत.

मालिका आपल्या नावावर करण्यापासून भारतीय संघ फक्त एक पाऊल मागे आहे. मालिकेतील पहिल्‍या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवत बराेबरी साधली. आता पाचवा आणि निर्णायक सामनाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Back to top button