टीम इंडिया आयपीएलनंतरही व्यस्तच | पुढारी

टीम इंडिया आयपीएलनंतरही व्यस्तच

नवी दिल्ली : इंग्लंडच्या आगामी दौर्‍यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी आशिया चषक स्पर्धेत खेळण्यासाठी श्रीलंकेला आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौर्‍यावर जाऊ शकते, तर इंग्लंडच्या दौर्‍यावर टीम इंडिया एकमेव कसोटी सामना खेळत असताना दुसरा संघ आयर्लंडच्या दौरा करू शकतो.

श्रीलंकेविरुद्ध मायदेशात होणार्‍या टी-20 व कसोटी मालिकेनंतर आयपीएल होणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौर्‍यावर येणार आहे. हा दौरा पूर्वनिर्धारित आहे. या दौर्‍यात प्रोटिज संघ पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळेल.

त्यानंतर निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे एक कसोटी व तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी टीम इंडियास इंग्लंडला जावे लागणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये भारतीय संघाचा कोणताच कार्यक्रम नाही. यामुळे या काळात टीम इंडिया आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी श्रीलंका व त्यानंतर झिम्बाब्वे दौर्‍यावर जाण्याची शक्यता आहे.

Back to top button