कार्तिकचा रूह बाबा

kartik aryan
kartik aryan
Published on
Updated on

'भूल भुलैय्या' हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. या चित्रपटात अक्षय कुमारने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर १४ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग 'भूल भुलैय्या-२' प्रदर्शित झाला. यात कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिका साकारली. 'भूल भुलैय्या-२' हा कोरोना काळात आणि लॉकडाऊन नंतर हिट झालेला पहिला चित्रपट होता. आता 'भूल भुलैय्या-३'चा टीझर प्रदर्शित झाला आहे. कार्तिकची 'भूल भुलैय्या -३' मध्ये मुख्य भूमिका आहे. त्याने या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.. टीझरची सुरुवात एका हवेलीपासून होते. टीझर पुढे सरकतो तसे रूह बाबा बनलेल्या कार्तिकचा आवाज ऐकू येतो. तो म्हणतो, काय वाटले? कहाणी संपली? काही दरवाजे बंदच अशासाठी होतात की एकदिवस पुन्हा त्या दरवाजांना आपण उघडावे, असे कार्तिकने म्हटले आहे. यानंतर या चित्रपटातील 'आमी जे तोमार' हे गाणे वाजायला लागते आणि रुह बाबाची झलक पहायला मिळते. यावेळी मी आत्म्यांशी फक्त बोलणार नाही, तर आत्मा माझ्या शरीरातही प्रवेश करतील, असे रुह बाबा म्हणतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news