सलमान अद्याप अविवाहित आहे. त्याच्या आयुष्यात अनेक अभिनेत्री येऊन गेल्या; पण त्यांचे नाते काही पुढे सरकले नाही. त्याच्या प्रेमकहाणींची खूपच चर्चा झाली; पण सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सोबत झालेल्या प्रेमकहाणींची! 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या सेटवर सलमान आणि ऐश्वर्या प्रेमात पडले. यापूर्वी सलमान हा अभिनेत्री सोमी अलीसोबत नात्यात होता; पण ज्यावेळी, सोमीला ऐश्वर्यासोबतच्या त्याच्या नात्याची माहिती समजली, त्यावेळी सलमानसोबत ब्रेकअप करण्याचे सोमीने ठरविले.
एका मुलाखतीत सोमी म्हणाली की, 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. एके दिवशी मी सलमानला फोन केला; पण त्याने तो घेतला नाही. त्यानंतर मी चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना फोन केला आणि ते म्हणाले, की सलमान सध्या तुझ्याशी बोलू शकत नाही कारण तो एका सीनच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हे ऐकून मला खूप विचिन्त्र वाटले. मी त्यांना म्हणाले की, तो सीन करत असेल तर तुम्ही दिग्दर्शन का करत नाही? तुम्ही माझा फोन का उचलत आहात? त्यानंतर ऐश्वर्या ही सलमानच्या जिममध्ये येऊ लागली, तेथे मी आणि सलमान एकत्र राहत होतो.