

पुढारी ऑनलाईन डेस्क - कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच मालिकेने रसिकांची मने जिंकली असून, आता या मालिकेत एक नवा आणि रंजक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सानिका तिचा हरवलेला अर्धा कडा मिळावा म्हणून मंदिरात देवीच्या चरणी प्रार्थना करताना दिसते. ती देवी आईला म्हणते, "जोपर्यंत मला माझा अर्धा कडा मिळत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही."
या दृश्यात विशेष म्हणजे सानिका आणि सरकार एकाच वेळी प्रार्थना करत असताना त्यांच्यातील नात्याचा धागा दृढ होत जातो. मंदिरात त्याचवेळी त्यांच्या गळ्यात हार पडतो. दुसरीकडे, सईने अप्पांना स्पष्ट सांगितले आहे की, "तिला सरकारसोबतच लग्न करायचे आहे आणि जर असे झाले नाही, तर ती आपला जीव देणार." हा नवा ट्विस्ट मालिकेत आता नवे वळण आणणार आहे. 'लय आवडतेस तू मला' दररोज रात्री 9:30 वा. पाहता येईल.