पुढारी ऑनलाईन डेस्क - मातृत्व, विवाह आणि मैत्री यामध्ये संतुलन राखणे सोपे नाही आहे, पण सोनी लिव्हवरील बहुप्रतीक्षित सीरीज ‘रात जवां है'मधील प्रमुख पात्र राधिकाने या बाबीला प्रत्यक्षात आणले आहे. प्रतिभावान अंजली आनंद सीरीजमध्ये राधिकाची भूमिका साकारत आहेत. राधिकाचा प्रवास ताकद, असुरक्षितता आणि लुप्त भावनिक संघर्षांनी भरलेला आहे. अंजली यांनी उत्तमपणे ही गुंतागुंतीची भूमिका साकारली आहे. (Raat Jawaan Hai -)
अंजली आनंद म्हणाली, “राधिका माझ्यासारखी नाही, पण तिचे दिसणारे पैलू आत्मसात करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे. तिची भूमिका साकारताना मला स्वत:ची वेगळी बाजू दाखवण्याची आणि अशा शक्तिशाली, स्वावलंबी महिलेकडून शिकण्याची संधी मिळाली. मी तिचा आत्मविश्वास आणि स्पष्टपणे मत व्यक्त करण्याच्या तिच्या क्षमतेचे कौतुक करते. माझी वास्तविक जीवनात निश्चितच ‘राधिका'सारखी बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. तसेच सेटवरील सकारात्मक वातावरण आणि सर्वांच्या अविश्वसनीय पाठिंब्यामुळे ही भूमिका प्रभावीपणे साकारता आली. हा संस्मरणीय अनुभव राहिला आहे.''
सीरीज ‘रात जवां है' राधिका, अविनाश (बरूण सोबतीने साकारलेली भूमिका) आणि सुमन (प्रिया बापटने साकारलेली भूमिका) यांच्या जीवनाच्या अवतीभोवती फिरते, जेथे ते त्यांची वैयक्तिक ओळख व मैत्री कायम ठेवण्यासोबत पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करतात. या सीरीजमध्ये, राधिका ही गुंतागुंतीची भूमिका म्हणून दाखवण्यात आली आहे. स्वत:मध्ये त्रुटी आणि आत्मविश्वासाची कमतरता असताना देखील ती सर्वांना आधार देते, ज्यामुळे तिन्ही मित्रांमधील मैत्री कायम घट्ट राहते.
यामिनी पिक्चर्स प्रा. लि.द्वारे निर्मित सीरीज ‘राज जवां है'चे लेखन व निर्मिती ख्याती आनंद - पुथरन यांनी केले आहे. सुमीत व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. या कॉमेडी-ड्रामामध्ये प्रतिभावान स्टार कलाकार आहेत. ‘रात जवां है' पाहण्यास पर्वणी अशी सिरीज आहे, ज्यामध्ये हसवून-हसवून लोटपोट करणारे क्षण आणि हृदयस्पर्शी सीन्सचा समावेश आहे.
‘रात जवां है' सीरीज ११ ऑक्टोबरपासून सोनी लिव्हवर पाहता येईल.