अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सतत चर्चेत रहात आली आहे. ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यात काही आलबेल नसल्याची चर्चा प्रदीर्घ कालावधीपासून चालत आली आहे. अंबानीच्या विवाह सोहळ्याला ते दोघेही स्वतंत्रपणे आले आणि स्वतंत्रपणे परतले. त्यामुळे याला आणखी पुष्टी मिळाली. हल्ली अभिषेक फक्त त्याच्या कुटुंबीयांसोबत दिसून येतो. तर ऐश्वर्या ही तिची मुलगी आराध्यासोबतच दिसून येते.
नुकतीच ती आराध्यासोबत दुबईला एका पुरस्कार सोहळ्यात गेली होती. तेथील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील ऐश्वर्याच्या एका गोष्टीने नेटकऱ्याचे लक्ष वेधले आहे. ते म्हणजे तिच्या हातात साखरपुड्याची अंगठीच दिसून आली नाही. ऐश्वर्याच्या हातात नेहमीच तिच्या साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळायची. मात्र, यावेळी ती न दिसल्याने पुन्हा एकदा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
ऐश्वर्या ही आराध्यासोबत पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. दुबईत ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तिचे जोरदार स्वागत केले होते. आईला पुरस्कार मिळाल्यानंतर आराध्यानेही तिचे फोटो क्लिक केले. ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या दोघांना एकत्र पाहिले गेलेले नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाला दोघेही वेगवेगळे आले होते. त्यातच आता हातातील विवाहाची अंगठीही दिसून येत नसल्याने चर्चा तर होणारच!