मी ५९ वर्षांचा, एकटा नाही राहू शकत; आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार?

Aamir Khan : 'माझे दोन वेळा लग्न अयशस्वी ठरले, मला पार्टनर हवाय'
Aamir Khan marriage
आमिर खान तिसऱ्या लग्नाविषया काय म्हणाला? Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - सुपरस्टार आमिर खानने आपल्या खासगी आयुष्याला नेहमी लाईमलाईटपासून दूर ठेवलं आहे. आमिरचे रीना दत्ता-किरण राव या दोन पत्नींसोबत घटस्फोटानंतरही खूप चांगले नाते आहे. आता आमिर खान तिसरे लग्न करणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट चॅप्टर २ वर आमिर खानला लग्नाविषयी वैयक्तिक मत विचारण्यात आले. तेव्हा उत्तरात ते म्हणाले ‘माझे दोन वेळा लग्न अयशस्वी ठरले आहे. माझे मत विचारु नका. मला एकटे राहणे आवडत नाही. मला पार्टनर हवाय. मी एकटा राहणारा माणूस नाहीये. मी रीना आणि किरण खूप जवळ आहे. आम्ही कुटुंबाप्रमाणे आहे. आयुष्याचा कोणताही भरोसा नाही. मला स्वत:च्या जीवनाचा भरोसा नाही. तर मी अन्य कुणाच्या आयुष्याचा विश्वास कसा करू? तर लग्न चांगलं चालू शकते आणि हे दोन लोकांवर अवलंबून आहे.’

तिसरे लग्न करणार आमिर खान?

रिया चक्रव्रतीने आमिर खानला विचारले की, ते तिसऱ्या लग्नाविषयी विचार करतात? या उत्तरादाखल तो म्हणाला ‘मी ५९ वर्षांचा आहे, आता कुठे लग्न करणार? खूप कठिण वाटत आहे. माझ्या आयुष्यात इतके सर्व नाती आहेत. मी माझ्या कुटुंबासोबत पुन्हा जोडलो गेलो आहे. माझी मुले, माझे भाऊ-बहिण. मी त्या लोकांसोबत राहून आनंदी आहे, जे माझ्या जवळ आहेत. मी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहे.’

या चित्रपटात दिसणार आमिर खान

आरएस प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ चित्रपट आमिर खान घेऊन येत आहे. जेनेलिया डिसूजा देखील या चित्रपटात आहे. यावर्षी ख्रिसमसच्या औचित्याने हा चित्रपट रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news