पुढारी ऑनलाईन : नेहमीच महिलांच्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा असलेली 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत राजवीर आणि मयूरीची प्रेम कहाणी दिवसेंदिवस सुंदर फुलत चालली आहे. पण राजवीरला भाऊसाहेब म्हणजेच, मयूरीचे सत्य समजणार का? किंवा राजवीरला ते कळाले आहे काय ? असे प्रश्न निर्माण करणारे ट्विस्ट आणि टर्न आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. राजवीरच्या घरी यामिनीने पेढीतील महिलांसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी मंगळागौरीचे खेळ ठेवले आहेत.
दरम्यान राजवीरने मयूरीला घरच्या मंगळागौरीला बोलावले आहे. त्यामुळे भाऊसाहेबच्या उपस्थितीत मयूरी राजवीरच्या घरी मंगळागौरीला जाणार का? हे पहाणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. शिवाय हा खेळ जिंकणाऱ्या महिलेला रोख बक्षिसे सुद्धा मिळणार आहे. आता मयुरी कशाप्रकारे सजून मंगळागौरीला येईल आणि कसे खेळ रंगतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याशिवाय चक्क यामिनी आणि मयुरी यांच्यात मंगळागौर रंगणार आहे ते देखील प्रेक्षकांना पाहता येईल.
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत भाऊसाहेब म्हणजेच, बॉडीगार्डच्या वेशात असताना मयूरी म्हणून राजवीरला भेटण्यासाठी मयूरीला तारेवरची कसरत करावी लागते. आता तर मंगळागौरीसाठी बोलावले असल्याने मयूरीला खास मराठमोळ्या पारंपरिक वेशात राजवीरच्या घरी जावे लागणार. या दोन वेगवेगळ्या वेशभूशेतील कसरत मयूरी कशी सांभाळणार?, त्यासाठी तिला काय काय युक्त्या कराव्या लागतील?, का तिची फाजीती होते? हे मालिकेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :