Hera Pheri 3 : ‘हेरा फेरी 3’मधून दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा पत्ता कट? | पुढारी

Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3'मधून दिग्दर्शक अनीस बज्मी यांचा पत्ता कट?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचा आगामी ‘हेरा फेरी ३’ ( Hera Pheri 3 ) अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातून याआधी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनचा चित्रपटातून पत्ता कट झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता या चित्रपटात आधीचे कलाकार म्हणजेच, परेश रावल, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार एकत्रित आले आहेत. ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी धमाकेदार प्रोमो शूट करून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर प्रोमोला चाहत्यांनी कौतुक करत भरभरून दाद दिली. याचदरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी हे करणार होते. परंतु, आता त्याचा पत्ता कट होवून त्याच्या जागी आता फरहाद सामजी हे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी अक्षय कुमारच्या एन्ट्रीबद्दल आणि स्वत: दिग्दर्शन न करण्याबाबतचा खुलासा केला आहे. यात त्यांनी ‘निर्माता फिरोज नाडियाडवाला यांना अनेकवेळा भेटलो होतो. परंतु, त्याच्याकडे कोणतीही चांगली स्क्रिप्ट नव्हती. त्यामुळे मला ही कल्पना आवडली नाही, मी म्हणालो, स्क्रिप्ट नाही, हिट नाही, ही खूप साधी गोष्ट आहे. जेव्हा मी चित्रपटाची ऑफर नाकारली, तेव्हा असे ऐकले होते की, कोणीतरी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. अक्षय कुमारला हवी तसी स्क्रिप्ट मिळाली नव्हती. परंतु, त्याची अचानक कशी एन्ट्री झाली हे मला माहित नाही. हे फक्त तोच सांगू शकतो. मी एवढेच म्हणू शकतो की, मी या चित्रपटाचा भाग नाही.’

याशिवाय अनीस बज्मी यांनी निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की, भेटलो तेव्हा चित्रपटाची स्क्रिप्ट चांगली नसल्याचे कारण दाखवले होते. जर आधीच स्क्रिप्टची माहिती देवून चांगली आहे असे म्हटलं असते तर कदाचित मी हा चित्रपट करण्यास तयार झालो असतो. ( Hera Pheri 3 )

हेही वाचा : 

Back to top button