कंगना राणावत : ‘द काश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉलिवूडची सर्व पापं धुतली गेली’ | पुढारी

कंगना राणावत : 'द काश्मीर फाईल्स चित्रपटाने बॉलिवूडची सर्व पापं धुतली गेली'

पुढारी ऑनलाईन डेस्क : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन रावल यांसारख्या अभिनेत्यांच्या अभिनयांनी सुसज्ज असणाऱ्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नेहमी चर्चेत राहणारी बॉलीवूड ड्रामा क्वीन कंगना राणावतने देखील हा चित्रपट पाहिला. कंगनाने चित्रपटाचे कौतूक केलं आहे. द काश्मीर फाईल्स हा वर्षातील पहिला यशस्वी बॉलीवूड हिट आहे असे सांगून तिने आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’वर टीका केली.

कंगनाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणते की हा खूप चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे आणि बॉलीवूडची सर्व पापे धुवून टाकण्यात यशस्वी ठरला आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने इंडस्ट्रीतील सर्व पापे धुवून काढली आहेत. इतका चांगला चित्रपट झाला आहे, हे कौतुकास्पद आहे. इंडस्ट्रीतील लोक लपलेले असतात, उंदरांप्रमाणे त्यांनी बाहेर येऊन बकवास चित्रपटांचे प्रमोशन व प्रचार करत असताना दिसतात, असे कंगनाने तिचे मत मांडले.

याआधी यामी गौतमही ‘द काश्मीर फाइल्स’च्या समर्थनार्थ समोर आली होती. तिनेदेखील चिञपटाबद्दल ट्विट करून सांगितले की, ‘काश्मिरी पंडिताशी लग्न केल्यामुळे, मला या शांतताप्रिय समुदायाच्या अत्याचारांबद्दल माहिती आहे. परंतु यासंबंधी देशामध्ये अजूनही अज्ञान आहेत. एका चित्रपटाच्या माध्यमातून सत्य समोर आणण्यासाठी आम्हाला ३२ वर्षे लागली.

हेही वाचा

Back to top button