आता साहेबांनी बाहेर कुठंही न जाता जागेवर बसून रिमोट फिरवावा; शरद पवार म्हणाले, ‘मी काय म्हातारा झालोय का?’

आता साहेबांनी बाहेर कुठंही न जाता जागेवर बसून रिमोट फिरवावा; शरद पवार म्हणाले, ‘मी काय म्हातारा झालोय का?’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी 'मी काय म्हातारा झालोय का?' असं म्हणत मिश्किल टीप्पणी केली आहे. खासदार शरद पवार हे पुरंदर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. या वेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या तब्येतीची काळजी करत साहेबांनी बाहेर फिरु नये, असं सांगितलं. यावर शरद पवार यांनी आपल्या मिश्किल शैलीत उत्तर देत 'मी काय म्हातारा झालोय का?' असं त्या कार्यकर्त्याला विचारलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार यांनी परींचे गावातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. त्याच दरम्यान गावातील काही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी करत आता साहेबांनी बाहेर कुठंही फिरू नये आणि एका जागेवर बसून पूर्ण रिमोट फिरवावा, अशी मागणी एका वयोवृद्ध पदाधिकारी यांनी केली. पदाधिकाऱ्याच्या या प्रश्नावर मी अजून म्हातारा झालो नाही, अशी मिश्किल टिप्पणी पवारांनी केली.

पुढे बोलताना शरद पवारांनी म्हटलं की, 'राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारनं योग्य उपाय योजना करायला पाहिजे होती. ती उपाययोजना करताना सरकार कुठेही दिसत नाही. त्यांच्या हातात केंद्राची सूत्रे आहेत. मात्र ते ग्रामीण भागातील लोकांसाठी काही ठोस अशी भूमिका घेताना दिसत नाहीत. जेव्हा माझ्याकडे केंद्राची सूत्र होती, तेव्हा शेतकऱ्यांची 72 हजार कोटींची कर्ज माफी आम्ही केली. आता जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल म्हणून मी इथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आलो आहे.'

खासदार शरद पवार यांनी म्हटलं की, पुरंदर तालुक्यातील लोकांनी मला खूप प्रेम दिलं. पुरंदरचे लोक आधी गिरणी कामगार म्हणून ओळखले जायचे. आता पूर्वीसारखी परिस्थिती नाहीय. त्यांच्या शेतीचे प्रश्न सुटले नव्हते म्हणून सन्मानाने जगण्यासाठी पुरंदरमधील लोकांनी विविध व्यवसाय केले. आता इथे सर्व लोक शेती करून त्यासोबत व्यवसाय करू लागले आहेत. पूर्वी तालुक्यातील लोकांना भेटायचं म्हटलं तर आधी रोजगार हमीची काम सुरू करा अशी मागणी व्हायची. आता चित्र बदलले आहे. सध्या लोक कारखान्याची मागणी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news