राज ठाकरेंनी इतर पक्षाचे काम करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाढवावा : जयंत पाटील

राज ठाकरेंनी इतर पक्षाचे काम करण्यापेक्षा स्वत:चा पक्ष वाढवावा : जयंत पाटील
Published on
Updated on

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : राज ठाकरे सध्या महाराष्ट्राचा दौरा करून स्वत:चा पक्ष वाढविण्याचे काम करत आहेत. राज ठाकरेंनी इतर पक्षाचे काम करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाचे काम करावे, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, राज ठाकरे हे स्वताच्या पक्षाचे काम करायचे सोडून भाजपचे काम करीत आहेत. त्यांनी आधी स्वत:चा पक्ष वाढवावा. पक्षवाढीसाठी हा दौरा असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. ते म्हणाले, इडीपासून दूर पळणाऱ्या आ. प्रताप सरनाईक यांना ईडीने क्लिन चिट दिल्याने भाजप विरोधकांना संपविण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. प्रताप सरनाईक निर्दोष होते तर त्यांच्या चौकशीचा आटापिटा तर का केला? तुम्ही राजकीय विचार बदलला की ईडीचा ससेमिरा संपतो हे आता जनतेच्याही लक्षात आले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत आला आहे. त्यामुळे सरकारने उध्दव ठाकरे यांना येथेच मेळावा घेण्यास परवागनी द्यावी. यात राजकारण आणू नये. शिंदे गटालाही मेळावा घ्यायचा असेल तर त्यांनी इतर ठिकाणी घ्यावा असेही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news