गंभीर रुग्ण ते गर्भवतींपर्यंतच्या मंडळींना वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. कितीतरी ठिकाणी वावर असलेली व्हीआयपी संस्कृती ही लोकांना तापदायक ठरते. मंदिराच्या ठिकाणी एखादा माननीय आला तर सामान्य नागरिकांची दर्शन रांग थांबवली जाते. गर्दीत ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांचे हाल होतात. या अनुभवामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ राहतात. अशीच स्थिती रस्त्यावरून जाताना अनुभवास येते. म्हणून गर्दीतून, कोंडीतून सुटका मिळण्यासाठी आणि गंभीर रुग्णांना जोखमीपासून वाचवण्यासाठी शासन दरबारी निर्णय घेणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर तातडीने अंमलबजावणी करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.