तिकिटे जमवा अन् 6000 रुपये शिष्यवृत्ती मिळवा; पोस्टाची विद्यार्थ्यांसाठी दीन दयाल स्पर्श योजना

तिकिटे जमवा अन् 6000 रुपये शिष्यवृत्ती मिळवा; पोस्टाची विद्यार्थ्यांसाठी दीन दयाल स्पर्श योजना
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : लहानपणी बर्‍याच मुलांना दुर्मीळ नाणी, एसटी वा रेल्वेची तिकिटे, माचीसचे खोके, कोल्डड्रिंकची बूच जमा करणे तर काहींना पोस्टाची वेगवेगळ्या चित्रांची तिकिटे गोळा करणे यांपैकी कुठला तरी एक छंद हा असतोच. असाच छंद जोपासणार्‍या अन् पोस्टाची तिकिेट गोळा करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी भारतीय पोस्ट विभागाच्या दीन दयाल स्पर्श योजनेद्वारे शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. यासाठी विभागाच्या वतीने प्रचार-प्रसाराचे काम हाती घेतले आहे.

ही योजना अखिल भारतीय स्तरावर सुरू करण्यात आली असून, याद्वारे एकूण 920 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. देशातील प्रत्येक सर्कलमधून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

इयत्ता 6 वी ते 9 वीमधील विद्यार्थी पात्र :
इयत्ता सहावी ते नववीमधील विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार आहेत.
योजनेद्वारे महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त 40 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्तीचा तपशील : 
पात्रता अटींची पूर्तता करणार्‍या आणि अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 500 रुपये प्रतिमहिना याप्रमाणे वर्षाला 6000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

शिष्यवृत्तीसाठी निकष :
स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक शाळेला फिलाटली ग्रुपचे खाते पोस्टात काढावे लागणार आहेत. ज्या शाळांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना 15 ते 20 विद्यार्थ्यांचा फिलाटली ग्रुप बनवावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रसिध्द फिलाटलीस्टद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असा फिलाटली क्लब बनविला जाणार आहे. हे विद्यार्थ्यांना फिलाटलीसंबंधी प्रोजेक्टमध्ये मदत करणार आहेत.

पात्रता अटी :
मान्यताप्राप्त शाळेच्या फिलाटली क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. किंवा त्याचे फिलाटली डिपॉझिट खाते असणे आवश्यक असून, शेवटच्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त केलेला असावा. यामध्ये अनु. जाती आणि अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना 5 टक्के सूट आहे.

फिलाटली खाते :
फिलाटली डिपॉझिट खाते हे 15 ते 20 विद्यार्थ्यांचे मिळून किंवा वैयक्तिक काढता येते. यासाठी दोनशे रुपये भरून हे खाते उघडता येणार आहे.

निवड प्रक्रिया :
शिष्यवृत्तीसाठी दोन स्तरात निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
1) फिलाटली लेखी परीक्षा
2) फिलाटली प्रोजेक्ट
– लेखी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट सादर करता येणार आहेत. प्रोजेक्टच्या मूल्यमापणानंतर विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाणार आहे.

शिष्यवृत्तीचा उद्देश :
या योजनेव्दारे विद्यार्थ्यांमध्ये डाक तिकीट संग्रहाचा छंद, त्यांच्या योग्यता व संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी फिलाटली प्रतियोगिता घेतली जाते.

फिलाटली म्हणजे नेमके काय ?
– पोस्टाच्या तिकिटांचा आणि पोस्टाचा अभ्यास करणारे म्हणजे फिलाटली होय.

कधी आहे परीक्षा 
अर्ज सादर करण्याचा कालावधी : 9 सप्टेंबर
परीक्षा 17 सप्टेंबर तर निकाल ऑक्टोबर महिन्याच्या 4 तारखेस असणार. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यास प्रोजेक्ट सादर करावा लागणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news