देशात खासगी विमानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. मोठमोठे उद्योजक व अन्य लोकांची खासगी विमाने आहेत. त्यांना विमान उतरविण्यासाठी सध्या मुंबईतील विमानतळ वापरावे लागते. यासह तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोठ्या प्रमाणावर होतात. पुणे विमानतळाचा विस्तार झाला आहे, पण ते संरक्षण विभागाच्या अखत्यारितील विमानतळ आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथील विमानतळावरील ताण कमी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी सध्या अंबानींकडे असलेल्या विमानतळांवरही नाईट लॅण्डींग सुरु केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी एकत्र बसून लवकरात लवकर पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू. तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, धाराशीव आदी जिल्ह्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे पवार म्हणाले.