नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत आणि नवीन संसद लोकार्पण सोहळ्यातही भारताला पुढच्या 25 वर्षांत विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प सोडलेला आहे. मोदींनी भारताला पाच ट्रिलियन म्हणजेच 5 हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे.