नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्व्हायकल कॅन्सर (गर्भाशयाचा कर्करोग) हा भारतातील महिलांना होणारा दुसरा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. देशात दरवर्षी 67 हजार महिलांचा मृत्यू या आजाराने होतो. प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर त्वरित डॉक्टरकडे जाणे व उपचार सुरू करणे, हे त्यामुळे केव्हाही हितावहच.
ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचे विविध स्ट्रेन्स या आजाराला कारणीभूत असतात. 35 ते 45 वर्षे वयाच्या महिलांना याचा धोका जास्त असतो. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास या आजाराची शक्यता बळावते.
जगभरात 2020 मध्ये 6 लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आढळून आली. पैकी 3.42 लाख मृत्यू झाले. 90 टक्के रुग्ण निम्न तसेच मध्यम उत्पन्न गटातील देशांतले आहेत.
1) स्क्वॅमस सेल कार्सिनोमा
2) अॅडेनोकार्सिनोमा
3) मिक्स्ड कार्सिनोमा