भुवनेश्वर, वृत्तसंस्था : ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये ५-जी सेवेला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून २६ जानेवारीपर्यंत राज्यातील इतर शहरांतही ही सेवा सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. २२ ऑक्टोबर रोजी भारतात ५- जी सेवेला प्रारंभ झाला असून २०२४ पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही सेवा देण्याचा विचार आहे.
सध्या एअरटेल व जिओ या दोन कंपन्या ५-जी सेवा देत असून पुढील वर्षीपासून बीएसएनएलही ५-जी सेवा सुरू करत आहे. ५-जी या अतिवेगवान सेवेचा लाभ मिळणाऱ्या राज्यांत 5G गुरुवारपासून ओरिसाचा समावेश झाला. राजधानी भुवनेश्वर येथे वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झाले, तसेच राज्याच्या ग्रामीण भागांतील ४-जीच्या १०० टॉवर्सचेही कार्यान्वयन त्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले आहे.