Election Commission : ऑनलाइन मते हटवता येत नाहीत, सर्व आरोप निराधार' : निवडणूक आयोगाने दिले राहुल गांधींना उत्तर

आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे प्रयत्न झाल्‍याचेही केले मान्‍य

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) फेटाळून लावले आहेत.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) फेटाळून लावले आहेत.
Published on
Updated on

Election Commission reply Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत घेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) फेटाळून लावला आहे. कोणत्याही मतदाराचे नाव ऑनलाइन पद्धतीने हटवता येत नाही, असा दावा करत राहुल गांधी यांचे आरोप आरोप पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे आयोगाचे आयोगाने म्‍हटलं आहे. दरम्यान, कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केल्याचेही आयोगाने स्‍पष्‍ट केले.

'राहुल गांधींनी चुकीची धारणा तयार केली आहे'

निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, "लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. कोणताही मतदार ऑनलाइन हटवला जाऊ शकत नाही, अशी चुकीची धारणा राहुल गांधी यांनी तयार केली आहे. संबंधित व्यक्तीला संधी दिल्याशिवाय कोणताही बदल किंवा नाव हटवणे शक्य नाही."

२०२३ मध्‍ये झालेल्‍या प्रकाराचीही दिली माहिती

कर्नाटकच्या आळंद विधानसभा मतदारसंघातून मतदारांची नावे हटवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते, हे निवडणूक आयोगाने मान्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची दखल घेत आयोगाने स्वतःहून गुन्हा (FIR) दाखल केल्याचेही आयोगाने स्‍पष्‍ट केले. रेकॉर्डनुसार, आळंद विधानसभा मतदारसंघात २०१८ मध्ये भाजपचे सुभाष गुत्तेदार आणि २०२३ मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले होते."


लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत मतदारांची नावे हटवल्याचे केलेले आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) फेटाळून लावले आहेत.
Rahul Gandhi Press Conference : पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त..... राहुल गांधी अजूनही हायड्रोजन बॉम्ब राखूनच!

राहुल गांधींनी कोणते आरोप केले ?

राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेत गंभीर गोंधळ झाल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी यावेळी तंत्रज्ञानाच्या मदतीनं वोटर डिलीशन कशाप्रकारे केलं जातं हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे पुरावे सादर करत सांगितलं. त्यांना दावा केला की निवडणूक आयोग अशा प्रकारे वोटर डिलीट करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे. कर्नाटक सीआयडीनं निवडणूक आयोगाला १८ पत्रं पाठवली मात्र त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही असा दावा केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्याला ही सर्व माहिती मिळवण्यात निवडणूक आयोगातीलच एका व्यक्तीनं मदत केल्याचा दावा देखील त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news